मुंबईच्या सुरक्षेच्या प्रश्नावर रोहिंग्या आणि घुसखोर बांगलादेशींचा मुद्दा सातत्याने मांडणारे मुंबई उपनगरचे सह-पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांना मालाड–मालवणीचे काँग्रेस आमदार असलम शेख यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री लोढा यांनी मुंबई पोलिस आयुक्त देवेन्द्र भारती यांना पत्र लिहून तक्रार नोंदवली आहे.
राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगरचे सह-पालक मंत्री लोढा यांनी असलम शेख यांच्या मालवणी विधानसभा क्षेत्रात राहणाऱ्या हजारो रोहिंग्या आणि अवैध बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम उघडली आहे. प्रशासनाद्वारे तेथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. पहिल्या टप्प्यात प्रशासनाने ९ हजार चौरस मीटर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त केली असून कारवाई सुरू आहे.
या संदर्भात मंत्री लोढा म्हणाले की, एका बाजूला मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय शहर दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आहे आणि दुसरीकडे आमदार असलम शेख मालवणीत अवैध बांधकामांना संरक्षण देऊन मुंबईच्या सुरक्षेशी खेळ करत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही. स्थानिक आमदार सतत समाजविघातक शक्तींना प्रोत्साहन देत आहेत आणि भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांना ठेच पोहोचवत आहेत. तसेच घुसखोर बांगलादेशींच्या अवैध बांधकामांविरोधात सुरू असलेली कारवाई रोखण्याचा प्रयत्न करून ते सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करत आहेत.
हे ही वाचा:
…अशी घ्या हिवाळ्यात डोळ्यांची काळजी !
नितीशकुमारांनी गृहमंत्रीपद भाजपाला दिले, खातेवाटप जाहीर
अधिक तंदुरुस्त राहायचंय मग, डाव्या कुशीवर झोपा!
भारताची अन्नधान्य उत्पादनात गरुडझेप
हा मुद्दा सतत मांडल्यामुळेच त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असे मंत्री लोढा यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई पोलिस आयुक्त देवेन्द्र भारती यांना पत्र देऊन तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, आमदार असलम शेख यांसारख्या विघटनकारी शक्ती कितीही धमक्या दिल्या तरी, देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही भीती न बाळगता रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईची मोहीम सुरूच राहील, असे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले आहे.







