30 C
Mumbai
Monday, May 11, 2026
घरराजकारणटागोर यांच्या जयंतीदिनी, पश्चिम बंगालमध्ये नवे सरकार घेणार शपथ

टागोर यांच्या जयंतीदिनी, पश्चिम बंगालमध्ये नवे सरकार घेणार शपथ

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पाच नावे असल्याची चर्चा

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या प्रचंड विजयानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपने २०६ जागा मिळवल्या असून, मागील निवडणुकीतील ७७ जागांच्या तुलनेत या निवडणुकीत १२९ जागांची वाढ झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुवेंदू अधिकारी हे प्रमुख नाव आहे. ते गेल्या पाच वर्षांपासून राज्यात विरोधी पक्षनेते होते. या निवडणुकीत त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच भवानीपूर मतदारसंघात पराभव केला.

पश्चिम बंगालच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा ९ मे रोजी होणार आहे. प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी शपथविधीच्या तारखेला दुजोरा दिला आहे. भाजपच्या विक्रमी विजयानंतर, टागोर यांच्या जयंतीदिनी, ९ मे रोजी नवीन सरकार शपथ घेईल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

राज्यात मुख्यमंत्री कोण होऊ शकेल? या यादीत पाच नावे समोर आली आहेत. ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर म्हणून भाजप एखाद्या महिलेला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत, परंतु दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील रेखा गुप्ता वगळता कोणत्याही राज्यात महिला मुख्यमंत्री नाहीत. महिला दावेदारांमध्ये सोनारपूर दक्षिणमधून विजयी झालेल्या रूपा गांगुली आणि अग्निमित्रा पॉल यांची नावे घेतली जात आहेत. रूपा गांगुली बऱ्याच काळापासून भाजपमध्ये आहेत. त्यांनी बंगालमध्ये महिला मोर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे.

हे ही वाचा:

प. बंगालमधील भाजपाच्या प्रचंड विजयानंतर अनेक वर्षे बंद असलेले दुर्गा मंदिर खुले

आरजी कर प्रकरणाचा तृणमूलला दणका; पानीहाटीमध्ये भाजपच्या रत्ना देबनाथ यांचा विजय

युक्रेनला कठोर इशारा देत रशियाकडून एकतर्फी युद्धविराम

चीनच्या हुनान प्रांतात फटाका कारखान्यात स्फोट; २१ जणांचा मृत्यू

टीएमसीमधून भाजपमध्ये सामील झालेले सुवेंदू अधिकारी हे पक्षाचे पोस्टर बॉय बनले आणि नंतर २०२६ च्या निवडणुकीत त्यांनी जायंट किलरची भूमिका बजावली. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना विद्यमान प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य, माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांच्याकडून आव्हान मिळू शकते. सुवेंदू अधिकारी यांना मंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून अनुभव आहे. ते सध्या ५५ वर्षांचे आहेत, तर सामिक भट्टाचार्य ६२ वर्षांचे आहेत. दिलीप घोष ६१ वर्षांचे आहेत. सुकांत मजुमदार फक्त ४६ वर्षांचे आहेत. रूपा गांगुली ५९ वर्षांच्या आहेत. अग्निमित्र पॉल ५१ वर्षांच्या आहेत. बंगालमध्ये भाजपची मुळे रुजवण्याचे श्रेय दिलीप घोष यांना आहे. त्यांना आरएसएसचा पाठिंबा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीदरम्यान स्पष्ट केले होते की, मुख्यमंत्रीपदी बंगाली भाषिक आणि बंगाली माध्यमात शिकलेला उमेदवार असेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा