27 C
Mumbai
Sunday, June 15, 2025
घरराजकारणकाँग्रेसचे नेते म्हणतात, ३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मिरात सुखशांती!

काँग्रेसचे नेते म्हणतात, ३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मिरात सुखशांती!

काँग्रेसच्या सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्याने काँग्रेसची होणार पळापळ

Google News Follow

Related

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या भारताच्या संविधानातील अनुच्छेद ३७० मुळे राज्याचे देशापासून वेगळेपण अधोरेखित होत होते आणि सरकारने ते रद्द केल्यामुळे ती धारणा अखेर संपुष्टात आली आहे, असे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी इंडोनेशियात एका प्रतिनिधीमंडळाशी बोलताना सांगितले.

काश्मीरची ‘स्वतंत्र ओळख’ ही एक मोठी समस्या होती, असे सांगून त्यांनी अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर झालेल्या सकारात्मक घडामोडींवर भर दिला. यामध्ये ६५ टक्के मतदानासह निवडणुका पार पडणे आणि निवडून आलेले सरकार अस्तित्वात येणे यांचा समावेश आहे, असे ते म्हणाले.

“काश्मीरमध्ये अनेक वर्षं मोठी समस्या होती. त्याचे प्रतिबिंब अनुच्छेद ३७० मध्ये दिसून येत होते, ज्यामुळे असे वाटत होते की काश्मीर देशापासून वेगळं आहे. पण आता तो अनुच्छेद रद्द करण्यात आला आहे आणि ही भावना संपुष्टात आली आहे,” असे खुर्शीद म्हणाले.

हे ही वाचा:

अंधारे रातो मे सुनसान राहो पर !

एलॉन मस्क यांचे ट्रम्प सरकारला टाटा बाय बाय!

शेतकऱ्याच्या मुलाने एनडीए प्रशिक्षणात टॉपर

१७ वर्षांची तहान… शेवटी RCB फाइनलमध्ये!

त्यांच्या मते, २०१९ मध्ये केंद्रातील भाजप सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने त्या भागात सकारात्मक बदल घडले आहेत आणि समृद्धी आली आहे.

“यानंतर झालेल्या निवडणुकीत ६५ टक्के मतदारांनी सहभाग घेतला. काश्मीरमध्ये आता निवडून आलेलं सरकार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींना पुन्हा मागे नेण्याची इच्छा चुकीची आहे,” असे त्यांनी इंडोनेशियातील थिंक टँक्स आणि शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधताना सांगितले.

सलमान खुर्शीद हे भारताच्या सिंदूर मोहिमेच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याचा भाग आहेत. या सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व जेडीयू खासदार संजय कुमार झा करत आहेत. हे प्रतिनिधीमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूर दौऱ्यावर असून त्यांनी या देशांना सिंदूर मोहिमेची माहिती आणि भारताची प्रादेशिक सुरक्षेवरील भूमिका समजावून सांगायची आहे.

दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारने, जिथे काँग्रेस सहयोगी आहे, सप्टेंबर २०२४ मध्ये सत्तेत आल्यानंतर विधानसभेत अनुच्छेद ३७० पुन:स्थापित करण्याचा ठराव मांडला होता. भाजपने याला तीव्र विरोध दर्शवला होता आणि स्पष्ट सांगितले होते की “इंदिरा गांधी स्वर्गातून परत आली तरी अनुच्छेद ३७० पुन्हा लागू केला जाणार नाही.”

काँग्रेसने सुरुवातीला केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवल्यानंतर काँग्रेसने हा मुद्दा आता ‘कायदेशीरदृष्ट्या बंद झाला आहे’ असे मान्य केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा