30.1 C
Mumbai
Monday, May 11, 2026
घरराजकारण११८ आमदार दाखवा आणि सरकार स्थापन करा!

११८ आमदार दाखवा आणि सरकार स्थापन करा!

तामिळनाडूचे राज्यपाल आर्लेकर यांनी विजय यांना दुसऱ्यांदा परत पाठवले

Google News Follow

Related

तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या टीव्हीके पक्षाचे टी. विजय यांचा सरकार स्थापनेचा दावा नाकारला. विजय यांनी आज पुन्हा राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला, मात्र ११८ आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतरच परत या, असे राज्यपालांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, टीव्हीकेकडे अजूनही बहुमतासाठी आवश्यक संख्या नसल्याचे राज्यपालांनी विजय यांना सांगितले आणि शपथविधी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ११८ आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन येण्यास सांगितले. कृपया ११८ आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन या. टीव्हीकेकडे बहुमत असल्याचे सिद्ध करा, त्यानंतरच शपथविधी होऊ शकतो,” असे राज्यपालांनी विजय यांना सांगितल्याचे समजते. सरकार स्थिर राहावे आणि स्थापनेनंतर कोसळू नये यासाठी लेखी पाठिंब्याचा आग्रह धरण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी असेही सांगितले की, राज्यपालांनी विजय यांना आश्वासन दिले की ते इतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करणार नाहीत. टीव्हीकेला त्यांच्या संख्याबळाच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या घेऊन पुन्हा येण्यास सांगितले आहे. त्यानंतर विजय यांचा शपथविधी होईल. दरम्यान, पलानीस्वामी यांनी राज्यपालांची भेट घेण्यासाठी कोणतीही वेळ मागितलेली नाही.

तमिळनाडू विधानसभा कार्यकाळ ९ मे रोजी संपत असल्याने राज्यपाल आर्लेकर यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी अजून काही दिवस आहेत. याआधीच्या दिवशीही विजय यांनी ११२ आमदारांच्या समर्थनासह सरकार स्थापनेचा दावा केला होता. काँग्रेसच्या पाच आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर विजय यांनी राज्यपालांना तोंडी माहिती दिली होती की, काँग्रेस त्यांच्यासोबत आहे आणि आणखी काही पाठिंबा मिळवण्यासाठी वेळ मागितला होता, असे सूत्रांनी सांगितले.

मात्र, राज्यपालांनी ही संख्या अपुरी असल्याचे सांगून ११८ आमदारांचा पाठिंबा घेऊन पुन्हा येण्यास सांगितले, ज्यामुळे नव्या राजकीय हालचाली सुरू झाल्या. थिरुमावलवन यांनी गुरुवारी राज्यपाल आर्लेकर यांना विजय यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याची आणि सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्याची मागणी केली.

हे ही वाचा:

परदेशी नोकरीचे आमिष दाखवून ‘सायबर गुलामगिरी’

पाणीहाटीमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर फेकले कच्चे बॉम्ब

जागतिक तणावामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ

कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा मोठी उसळी

प्रादेशिक माध्यमांशी बोलताना थिरुमावलवन यांनी भाजप तमिळनाडूच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला. लोकांनी टीव्हीकेला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून दिले असल्याने विजय यांना सरकार स्थापनेची संधी दिली पाहिजे आणि नंतर सभागृहात बहुमत सिद्ध करू द्यावे, असे ते म्हणाले.

“आता भाजप किंवा अमित शहा आणि नरेंद्र मोदी तमिळनाडूच्या राजकारणात हस्तक्षेप करून गोंधळ निर्माण करत आहेत. लोकांनी टीव्हीकेला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडले आहे. त्यामुळे त्यांना सत्तास्थापनेची संधी दिली पाहिजे. संविधानाचेही हेच मार्गदर्शन आहे,” असे त्यांनी म्हटले.

तमिळनाडूतील कम्युनिस्ट पार्टीच्या राज्य युनिटनेही राज्यपालांनी संविधानानुसार वागावे आणि शपथविधीपूर्वी विजय यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगणे “अयोग्य” असल्याचे म्हटले.

टीव्हीकेने तमिळनाडूमधील द्रविडीय पक्षांना मोठा धक्का देत डीएमके-एआयएडीएमकेच्या तीन दशकांच्या राजकीय वर्चस्वाचा अंत केला. विजय विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या दोन जागांपैकी एक जागा सोडणार असल्याने टीव्हीकेची प्रभावी ताकद १०७ वर येणार आहे. काँग्रेससह आघाडीची सध्याची संख्या ११२ असून बहुमतासाठी अजून पाच आमदारांची गरज आहे.

भारतीय संविधानाच्या कलम १६४ (१) नुसार राज्यपालांना मुख्यमंत्री नियुक्त करण्याचा अधिकार आहे. अपूर्ण बहुमताच्या परिस्थितीत योग्य उमेदवार निवडण्याचा अधिकारही राज्यपालांना आहे. इतिहासात अनेक राज्यांमध्ये राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला अल्पमत सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा