29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरक्राईमनामा"मनसुख हिरेन प्रकरणी ठाकरे सरकारला एनआयएचे भय कशाला?"- अतुल भातखळकर

“मनसुख हिरेन प्रकरणी ठाकरे सरकारला एनआयएचे भय कशाला?”- अतुल भातखळकर

Google News Follow

Related

“मनसुख हिरेनच्या हत्येचे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात ठाकरे सरकारला भय कशाचे वाटते? प्रत्येक आत्महत्या आणि हत्या अनुत्तरित राहावी अशी राज्य सरकारची ईच्छा आहे काय? हत्या करणाऱ्याना अभय कोण देतंय हे जनतेच्या समोर यायलाच हवे.” असे ट्विट भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास आता एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहविभागाकडून हा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “याचा तपास एटीएसकडे दिलेला आहे. या व्यतिरिक्त तपास एनआयकडे देण्याचा केंद्राचा डाव असेल तर यात नक्कीच काळंबेरं आहे.” माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटालिया या निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली. त्यातच या कारचे मालक असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीत आढळला होता. यानंतर या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एनआयएकडे तपास देण्याची मागणी केली होती.

हे ही वाचा:

मनसुख हिरेन प्रकरणात एफआयआर दाखल

त्यानंतर केंद्रीय गृहविभागाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, “यापूर्वीच हा तपास (महाराष्ट्राच्या) गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. आमचा आमच्या यंत्रणांवर विश्वास आहे. या व्यतिरिक्त या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचा केंद्राचा विचार असेल तर नक्कीच यात काही काळंबेरं आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा