29 C
Mumbai
Wednesday, September 9, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणऑपरेशन सिंदूरनंतर EOS-05 ही गरज होती

ऑपरेशन सिंदूरनंतर EOS-05 ही गरज होती

Related

भारतने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर देशाला आपली बलस्थाने लक्षात आली तशा सुरक्षा व्यवस्थांमध्ये असलेल्या त्रुटीही लक्षात आल्या. या त्रुटी दूर करण्यासाठी इस्त्रोने राबवलेल्या दोन मोहिमा अपयशी ठरल्या. या अपयशामागे काही फंदफितुरी आहे का? चीन किंवा पाकिस्तानने काही दगाफटका केलाय का? अशी चर्चा होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या प्रकरणी लक्ष घातले, त्यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात यावे. जे काही घडले ते उघड झाले नाही, सर्वसामान्य जनतेपर्यंत ते येईल याची अजिबात शक्यता नाही. परंतु भारताने चूकांमधून धडा घेत अपयशाची मालिका खंडीत केली हे मात्र निश्चित. ४ सप्टेंबर रोजी EOS-05 हा उपग्रह जिओसिंक्रोनस ऑर्बिट अर्थात भूस्थिर कक्षेत पोहचवण्यात इस्त्रोला यश आले. EOS-05 चा वापर नागरी आणि लष्करी कामांसाठी केला जाणार आहे. हवामान, शेती, पर्यावरणावर लक्ष ठेवण्यासाठी हा उपयुक्त आहेच, शिवाय हिंद महासागर, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा किंवा नियंत्रण रेषेवर २४ सतत नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. ईस्त्रोची ही यशस्वी कामगिरी एकाच वेळी भारताचे अर्थकारण आणि सुरक्षेला बळ देणार आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा