31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषकाय आहे दादरा, नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामातील बाबासाहेब पुरंदरेंची भूमिका?

काय आहे दादरा, नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामातील बाबासाहेब पुरंदरेंची भूमिका?

Google News Follow

Related

२ ऑगस्ट १९५४ ही तारीख भारतीय इतिहासातील जवळजवळ विसरलेला अध्याय आहे. याच दिवशी दादरा आणि नगर हवेलीला स्वातंत्र्य मिळाले होते. या दोन छोट्या एन्क्लेव्हला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले नाही. या स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा सहभाग होता. यामध्ये सहभागी असलेल्या स्वयंसेवकांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे देखील एक मोठे नाव होते.

दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करणार्‍या विधेयकावर संसदेत दादरा आणि नगर हवेलीवरील नोव्हेंबर २०१९ च्या चर्चेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले की “अनेक व्यक्तिमत्त्व… दादरा नगर हवेलीच्या पोर्तुगालपासून मुक्तीमागे आहेत.”

शाह यांनी बाबासाहेब पुरंदरे, सुधीर फडके आणि सैनिक शाळेचे अधिकारी प्रभाकर कुलकर्णी यांचा उल्लेख केला आणि त्यांनी आपला जीव पणाला लावून मोलाची भूमिका बजावल्याचे सांगितले.

सशस्त्र क्रांतीने त्यांची मुक्तता होईपर्यंत पोर्तुगीजांचे राज्य चालूच राहिले आणि २ ऑगस्ट १९५४ रोजी सिल्वासा येथे तिरंगा फडकवण्यात आला.

त्यानंतर सशस्त्र क्रांतिकारकांनी हे एन्क्लेव्ह भारत सरकारच्या ताब्यात दिले. तथापि, दादरा आणि नगर हवेलीला औपचारिकपणे भारताचा अविभाज्य भाग म्हणून मान्यता मिळण्यास काही वेळ लागला. कारण पोर्तुगालने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय मंचावर नेले आणि भारत सरकारच्या दाव्यांना विरोध केला.

१९६१ मध्ये गोवा मुक्तीदरम्यान घडलेल्या घटनेच्या विपरीत, दादरा आणि नगर हवेलीच्या बाबतीत भारतीय सशस्त्र दलांनी थेट हस्तक्षेप केला नाही.

पोर्तुगीज राजवटीचा समूळ उच्चाटन करण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणात सशस्त्र क्रांतिकारकांना दिले जाऊ शकते ज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठ्या संख्येने स्वयंसेवक होते.

पोर्तुगीजांनी १७८३ मध्ये दादरा आणि १७८५ मध्ये नगर हवेली ताब्यात घेतली होती.

बहुतेक रहिवासी वारली जमातीचे होते. पोर्तुगीजांनी या एन्क्लेव्ह्सवर कब्जा केल्यानंतर, धरमपूरच्या राजाशी अनेक हिंसक संघर्ष झाले, जो पूर्वी दादरा आणि नगर हवेलीचा शासक होता.

संघाची अधिकृत वेबसाईट म्हणते, “स्वयंसेवकांनी २ ऑगस्ट रोजी दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केली आणि हा प्रदेश केंद्र सरकारच्या ताब्यात दिला.” याशिवाय अनेक ग्रंथांमध्ये या एन्क्लेव्ह्सच्या मुक्तीमध्ये आरएसएसच्या भूमिकेचा उल्लेख आहे.

आरएसएसचे दिवंगत नेते, खासदार आणि पत्रकार के.आर. मलकानी यांनी त्यांच्या ‘द आरएसएस स्टोरी’ या पुस्तकात लिहिले आहे की, “२ ऑगस्ट १९५४ रोजी नाना काजरेकर आणि सुधीर फडके यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० आरएसएस कार्यकर्त्यांनी दादरा आणि नगर हवेली, पोर्तुगीज एन्क्लेव्ह मुक्त केले आणि रायफलसह सशस्त्र १७५ सैनिकांना बंदुका आणि स्टेन गनसह सामोरे गेले.”

२७ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या चर्चेच्या पीटीआय अहवालानुसार, “ते (केंद्रीय गृहमंत्री) म्हणाले की १९५४ पर्यंत गोवा, दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली असताना तत्कालीन सरकारने फारसे काही केले नाही. त्यांनी सांगितले की, तरुणांनी मग आंदोलन सुरू केले, प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी आंदोलनासाठी निधी गोळा करण्यासाठी पुण्यात एक कार्यक्रम आयोजित केला होता. या भागांच्या मुक्ततेचे श्रेय एकट्या नेहरूंना देऊ नये.” असे शाह म्हणाले.

हे ही वाचा:

… म्हणून आजचा दिवस मोदींसाठी भावनिक

ठाकरे सरकार राज्यात इस्लामिक दंगली भडकावतंय

अनिल देशमुख २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

काँग्रेस सत्तेत असताना भारतात अंशतः ‘इस्लामिक राष्ट्र’ होते

या संदर्भात, ते तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनाही उत्तर देत होते, त्यांनी चर्चेदरम्यान म्हटले होते की भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना या प्रदेशाच्या मुक्तीचे श्रेय दिले पाहिजे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा