29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषबीडीडी चाळीतील पाेलिसांना मिळणार १५ लाखांत घर

बीडीडी चाळीतील पाेलिसांना मिळणार १५ लाखांत घर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घाेषणा

Google News Follow

Related

बीडीडी चाळीतील पाेलिसांना १५ लाख रुपयांत घर उपलब्ध करून देण्याची घाेषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. पाेलिस बांधवांना ५० किंवा ३५ लाख परवडणार नाही. त्यामुळे कमी किंमतीत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांना नाममात्र दरात घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. हाेतं. विधानसभेत या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन आता पाेलिस बांधवांना १५ लाखात घर देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मुंबई पाेलिसांना माेठा दिलासा मिळाला आहे.

वरळी ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळीतील २२५० सेवा निवृत्त पोलीस कुटुंब वास्तव्यास आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार १ जानेवारी २०११ पर्यंत वास्तव्यास असलेल्या सेवा निवृत्त व सेवेत असलेल्यांना हक्काची घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निकषानुसार २२५० सेवानिवृत्त आणि सध्या सेवेत असलेल्या पोलिसांना घर मिळणार आहे. मात्र बीडीडी चाळींतील सेवानिवासस्थानांमध्ये पोलीस वास्तव्यास असल्याने त्यांना कायमस्वरूपी मोफत घरे देता येणार नाहीत, असा मुद्दा आधीच्या ठाकरे सरकारने उपस्थित केला हाेता. होता. मात्र सरकारने त्यासाठी विशेष तरतूद करून अखेर पोलिसांची मागणी मान्य केली. पण सरकारने यासाठी बांधकाम शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला या किंमतीला देखील पाेलिस कुटुंब आणि संघटनांनी विराेध केला हाेता.

हे ही वाचा:

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ

पत्राचाळ नागरिकांना २५ हजार भाडे

बीडीडी चाळीतील नागरिकांना ५०० चौरस फुटाची घरे देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्याचबरोबर अनेक वर्ष रखडलेल्या गिरणी कामगारांनाही लवकरच घरे देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेतील २९ हजार सफाई कर्मचाऱ्यांना देखील हक्काचे घर मिळणार आहे. त्याचबरोबर पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील नागरिकांना २५ हजार रुपयांपर्यंत भाडे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा