30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
घरविशेषखर्गेंच्या पत्रानंतर भाजपने काढला मनमोहन सिंग यांचा जुना व्हीडीओ

खर्गेंच्या पत्रानंतर भाजपने काढला मनमोहन सिंग यांचा जुना व्हीडीओ

Google News Follow

Related

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल प्रबोधन करण्याचा प्रयत्न करणारे खुले पत्र लिहिल्यानंतर आता भाजपने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा एक जुना व्हिडिओ काढून ते अल्पसंख्याकांना प्राधान्याने वागण्याचा अधिकार असल्याबद्दल काय म्हणाले आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपच्या म्हणण्यानुसार, एप्रिल २००९ च्या एका व्हिडिओमध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले, अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लिम अल्पसंख्याक, जर ते गरीब असतील, तर त्यांचा देशाच्या संसाधनांवर पहिल्यांदा दावा आहे.
काँग्रेसने लोकांच्या कष्टाने कमावलेला पैसा हिसकावून घेऊन ते “घुसखोर” आणि “ज्यांना अनेक मुले आहेत त्यांना” वाटून देण्याचे आश्वासन दिले होते, असे एका निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींनी या वादाला तोंड फोडले होते.

हेही वाचा..

‘घरी बसून टिप्पणी करू नका, बाहेर पडा आणि मतदान करा’

‘सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने’

कोस्टल रोड ते वरळी सी लिंकला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी यशस्वी

दिल्ली विमानतळावर फिरत होता सिंगापूर एअरलाईन्सचा बनावट पायलट!

“लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी, डॉ. मनमोहन सिंग यांनी, देशाच्या साधनसंपत्तीचा विचार करताना अल्पसंख्याकांना, विशेषत: गरीब मुस्लिमांना प्राधान्य दिले पाहिजे या त्यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला.
“डॉ. मनमोहन सिंग यांच्या या निःसंदिग्ध प्रतिपादनामुळे काँग्रेसचा खोडसाळपणा आणि त्यांच्या मागील विधानावरील स्पष्टीकरण… हे आरक्षणापासून संसाधनांपर्यंत सर्वच बाबतीत मुस्लिमांना प्राधान्य देण्याच्या काँग्रेसच्या मानसिकतेचा आणखी पुरावा आहे,” असा आरोप भाजपने केला आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्यानंतर भाजपने हा हल्लाबोल केला आहे. त्यांचा दावा असा आहे की, त्यांच्या सल्लागारांकडून त्यांना काँग्रेसच्या न्याय पत्र किंवा जाहीरनाम्यात उल्लेख नसलेल्या गोष्टींबद्दल चुकीची माहिती दिली जात आहे. आपल्या दोन पानी पत्रात खरगे यांनी पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि “आमचे न्याय पत्र समजावून सांगा जेणेकरून पंतप्रधान म्हणून तुम्ही खोटी विधाने करू नयेत” अशी वेळ मागितली आहे.
मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सत्तेत असताना देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. “याचा अर्थ असा आहे की ते ही संपत्ती गोळा करतील आणि ज्यांना जास्त मुले आहेत, ते घुसखोरांमध्ये वाटतील. तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा घुसखोरांना दिला जाईल का? तुम्हाला हे मान्य आहे का? काँग्रेसचा जाहीरनामा हे सांगत आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.
काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले असून त्यांच्या जाहीरनाम्यात असे कोणतेही आश्वासन नसल्याचे म्हटले आहे. निवडून आल्यास पक्ष देशव्यापी सामाजिक-आर्थिक आणि जातीची जनगणना करेल, असे त्याच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा