32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेष... आणि भारत- पाकिस्तान सामन्याच्या शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी विमान उड्डाण लांबवलं?

… आणि भारत- पाकिस्तान सामन्याच्या शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी विमान उड्डाण लांबवलं?

Google News Follow

Related

ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगला असून काल मेलबर्नमध्ये कट्टर प्रतिस्पर्धक भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडले. मेलबर्नमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या आपल्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर चार विकेट्सनी रोमहर्षक विजय मिळविला. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणारा ठरला. त्यानंतर जिथे तिथे या सामन्याची चर्चा सुरू आहे. अशातच चक्क या सामन्यातील शेवटची दोन निर्णायक षटकं पाहण्यासाठी एका विमानाचं उड्डाण पाच मिनिटं उशिराने केल्याची शक्यता समोर आली आहे. मुंबई विमानतळावर हा प्रसंग घडल्याचे एका अभिनेत्याने सांगितले.

भारताच्या विजयानंतर अभिनेता अयुषमान खुरानाने ट्वीटरवर तीन ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्याने सामन्यातील शेवटच्या दोन षटकं पाहता यावी म्हणून विमानचं उड्डाण पाच मिनिटं उशीराने झाल्याचं म्हटलं आहे. “ही गोष्ट माझ्या पुढल्या पिढ्यांना सांगता येईल. मी भारत- पाकिस्तान सामन्यातील शेवटची दोन षटकं मुंबई- चंदीगढ विमानामध्ये पाहिली. विमानाचे उड्डाण होण्याच्या काही मिनिटं आधी इतर प्रवाशीही त्यांचे मोबाईल घेऊन बसले असताना मी ही अशाच पद्धतीने शेवटची दोन षटकं पाहिली. मला विश्वास आहे की क्रिकेटचा चाहता असलेल्या वैमानिकाने मुद्दाम पाच मिनिटं उशीर केला आणि विशेष म्हणजे याबद्दल कोणीही तक्रार केली नाही,” असं आयुषमानने म्हटलं आहे.

“पंड्या आणि दिनेश कार्तिक बाद झाले. त्यानंतर अश्विन फलंदाजीसाठी आला. त्याने आरामात वाईड बॉल सोडून दिला. अंतिम धाव त्यानेच घेतली. मी यापूर्वी कधीच विमानामध्ये अशाप्रकारचा एकाच वेळी केलेला जल्लोष पाहिला नाही. आमचं विमान रनवेवर धावण्यासाठी तयार असतानाच हे सारं घडलं. वैमानिकानेही अचूक टायमिंग साधलं,” असंही ट्विट आयुषमान याने केले आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल ही माहिती आली समोर

गांधी कुटुंबाला दणका, राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द

उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान इस्रोबद्दल काय म्हणाले?

“मी हे रेकॉर्ड करु शकलो असतो तर किती बरं झालं असतं. मात्र, मला एक मान्य करावं लागेल की अशा गोष्टी सार्वजनिक आयुष्यात करायला मला अवघडल्यासारखं होतं. मला तो क्षण जगायचा होता. विराट कोहली आणि भारतीय संघाचे मी आभार मानतो त्यांनी एक दिवस आधीच देशाला दिवाळी साजरी करण्याची संधी दिली,” असंही ट्विट आयुषमान खुरानाने म्हटलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा