बांगलादेश उच्च न्यायालयाने बुधवारी (३० एप्रिल) माजी इस्कॉन पुजारी चिन्मय कृष्णा दास यांना अखेर जामीन मंजूर केला आहे. चिन्मय दास गेल्या सहा महिन्यांपासून देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात होते. चिन्मय दास यांचे वकील अपूर्व कुमार भट्टाचार्य यांनी २३ एप्रिल रोजी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
सुनावणीदरम्यान, चिन्मय कृष्णा दास यांच्या वकिलाने सांगितले की दास आजारी आहेत आणि खटल्याशिवाय तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. बांगलादेशी वृत्तपत्र द डेली स्टारने चिन्मय दास यांच्या वकिलाचा हवाला देत म्हटले आहे की, चिन्मय दास यांच्या सुटकेचा अद्याप निर्णय झालेला नाही. जर बांगलादेशी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली नाही तर चिन्मय दास यांची सुटका होईल.
दरम्यान, चिन्मय दास यांच्यावर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि २५ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांना अटक करण्यात आली. यापूर्वी २ जानेवारी रोजी, चितगाव येथील कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. याच दरम्यान, आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
हे ही वाचा :
मी इथे मतदान केले, माझ्याकडे रेशन कार्ड आहे, आता पाकिस्तानला जाऊन काय करू?
माजी रॉ प्रमुख आलोक जोशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख
“काश्मीर समस्येवर एकमेव मार्ग म्हणजे पीओके ताब्यात घेणे”
पाकिस्तानची भीतीने गाळण, दहशतवादी हाफिज सईद, मसूद अझरला लपवले!
संत चिन्मय प्रभू कोण आहेत?
चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांचे खरे नाव चंदन कुमार धर आहे. ते चितगाव इस्कॉनचे प्रमुख आहेत. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना ५ ऑगस्ट २०२४ रोजी देश सोडून गेल्या. त्यानंतर हिंदूंविरुद्ध मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडल्या.
यानंतर, बांगलादेशी हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सनातन जागरण मंचची स्थापना करण्यात आली. चिन्मय प्रभू त्याचे प्रवक्ता बनले. सनातन जागरण मंचच्या माध्यमातून चिन्मय यांनी चितगाव आणि रंगपूर येथे अनेक सभांना संबोधित केले. त्यात हजारो लोक सहभागी झाले होते.