भारताने पाकिस्तानातील प्रमुख शहरांवर भारताने ड्रोन हल्ले करत पाकिस्तानला घाम फोडलेला असताना भारताने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमला लक्ष्य केले आहे. जेव्हा एका भारतीय ड्रोनने स्टेडियमच्या जवळच्या फूड स्ट्रीट भागातील एका दुकानाला लक्ष्य केले, फेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यातील PSL 2025 सामन्याच्या काही तास आधी ही घटना घडल्यामुळे या लढती होणार का, याविषयी शंका उपस्थित झाली आहे.
पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, भारतीय ड्रोन झाडावर आदळून पडले व दुकानाच्या खिडक्यांचे नुकसान झाले. या घटनेत एक नागरिक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रावळपिंडीतील सुरक्षा धोक्यात
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (DG ISPR) चे महासंचालक ले. जनरल अहमद शरीफ यांनी सांगितले की, रावळपिंडी आणि अटकमध्येही ड्रोन निष्प्रभ करण्यात आले आहेत. PSL 2025 चे सामने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर नियोजित असल्याने परिसरातील सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्या आहेत.
या हल्ल्यात लाहोरमध्ये पाकिस्तानी लष्कराचे काही जवान जखमी झाले आहेत. सिंध प्रांतात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे.
PCB ची आपत्कालीन बैठक
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) PSL 2025 स्पर्धेच्या भविष्यावर निर्णय घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. स्पर्धा पुढे चालू ठेवायची की स्थगित करायची यावर चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधानांनी सचिवांसोबत घेतली उच्चस्तरीय बैठक
“ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या हल्ल्यांमध्ये १०० दहशतवाद्यांचा खात्मा”
मैदानावरचा सिंह आता स्वतःशी झुंजतोय…
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानचा शेअर बाजार ढासळला
तथापि, ७ मे रोजी PCB ने जाहीर केले होते की, भारताशी जवळपास युद्धसदृश परिस्थिती असतानाही PSL २०२५ नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहील.
भारतीय लष्कराची कारवाई व भारत-पाकिस्तान तणाव वाढला
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने बुधवारी सकाळी पाकिस्तान व पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यात बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद व मुरिदकेतील लष्कर-ए-तैयबाच्या तळांचा समावेश आहे.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील पूंछवर हल्ला केला, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. तरीही PCB च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आत्तापर्यंत कोणत्याही परदेशी खेळाडूने PSL 2025 मधून बाहेर पडण्याची मागणी केलेली नाही.
PSL संघातील प्रत्येक संघाकडे साधारणतः ५-६ परदेशी खेळाडू आहेत आणि त्यांच्या व्यवस्थापकांनी देखील याची पुष्टी केली आहे की कोणत्याही खेळाडूने आत्तापर्यंत स्पर्धा सोडण्याची मागणी केलेली नाही.