28.7 C
Mumbai
Saturday, August 8, 2026
घरविशेषचीप ते शिपपर्यंत सगळे तुम्हालाच करायचे आहे!

चीप ते शिपपर्यंत सगळे तुम्हालाच करायचे आहे!

पंतप्रधान मोदींचा जेन झींना कानमंत्र

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्लीच्या ५७व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी तरुणांनी केवळ प्रश्न विचारण्यापुरते मर्यादित न राहता त्यांची उत्तरे आणि उपाय शोधण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहन केले. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात जिज्ञासा कायम ठेवणे, सतत शिकत राहणे आणि बदलांशी जुळवून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या दीक्षांत समारंभात ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये ५८७ पीएचडी संशोधकांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वेगवान बदलांसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला. जग किती वेगाने बदलत आहे, हे लक्षात घेता पुढील २० ते ३० वर्षांत परिस्थिती कशी असेल, हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवावी, असे त्यांनी सांगितले. “जीवनातील जिज्ञासा जिवंत ठेवा आणि शिकण्याची वृत्ती कायम जागृत ठेवा,” असा संदेश मोदी यांनी दिला. त्यांच्या मते, पदवी मिळाल्यानंतर शिक्षण संपत नाही; बदलत्या जगात यशस्वी होण्यासाठी सतत नवीन गोष्टी शिकत राहणे आवश्यक आहे.

पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांना म्हणाले, तुम्हा सर्वांना माहीत आहे की प्रत्येक पिढीला तिच्या काळातील विशिष्ट आव्हानांना सामोरे जावे लागते आणि राष्ट्राप्रती आपली जबाबदारीही पार पाडावी लागते. तुमच्या आयुष्यातील पुढील ३० ते ३५ वर्षांत तुम्ही जे काही कराल, त्याचा परिणाम ‘विकसित भारता’च्या दिशेने होणाऱ्या आपल्या प्रवासावर होईल. त्यामुळे, तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय यावर आधारित असावाः यामुळे देशाला काय फायदा होईल? देशाच्या कोणत्या गरजा पूर्ण होतील?

नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. आजचे विद्यार्थी पुढील तीन ते साडेतीन दशकांमध्ये देशाच्या विकासप्रवासावर प्रभाव टाकतील, असे त्यांनी सांगितले. “देशाला तुमची गरज आहे आणि आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे,” असा संदेश त्यांनी तरुणांना दिला. विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःच्या करिअरचा विचार न करता देशासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न घेऊन पुढे जावे, असेही त्यांनी सांगितले.

पुढे पंतप्रधान मोदी यांनी जागतिक सामरिक समीकरणे आणि तंत्रज्ञानातील वेगवान बदलांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी भविष्यातील आव्हानांसाठी तयार राहण्याची गरज व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत संगणन आणि संशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सेमीकंडक्टर क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकताना मोदींनी आठवण करून दिली की, “जेव्हा सरकारने या उद्योगाच्या विकासासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली, तेव्हा प्रश्न उपस्थित केले गेले होते. परंतु आज, पहिल्या सेमीकंडक्टर युनिटमध्ये उत्पादन सुरू झाले आहे. चिप्सपासून जहाजांपर्यंत सर्व काही येथे तुमच्या हातांनी बनवले जाईल,” असे पंतप्रधान म्हणाले.

हे ही वाचा:

पेट्रोल दरवाढीविरोधात पाकिस्तानात संताप; प्रमुख शहरांमध्ये निदर्शने, रॅली

होर्मुज सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला

विंग कमांडर ‘हनी ट्रॅप’; पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवल्याचा आरोप

खालिद, शरजीलच्या सुटकेची मागणी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना जामीन नाही

या दौऱ्यात मोदी यांनी आयआयटी दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये ‘परम प्रज्ञा’ या कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम उच्च-कार्यक्षमता सुपरकॉम्प्युटिंग सुविधेचे उद्घाटन केले. ही सुविधा कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विज्ञान, प्रगत संगणन आणि आंतरशाखीय संशोधनाच्या क्षेत्रातील संस्थेच्या क्षमतेला बळकटी देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या सुविधेमुळे मोठ्या प्रमाणावरील कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स, मोठ्या डेटावर आधारित प्रकल्प आणि विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानांवरील संशोधनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
326,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा