29 C
Mumbai
Thursday, May 14, 2026
घरविशेषअंबरनाथमधील नदीत जलचर गुदमरले

अंबरनाथमधील नदीत जलचर गुदमरले

Google News Follow

Related

गेले कित्येक दिवस अंबरनाथमधील गोवरी नदीचे पाणी दूषित होऊन पिण्यायोग्य राहिले नाही. कारखान्यातील रासायनिक पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे नदीचे पाणी दुषित झालेले आहे. त्यात आता जलचर मरू लागले आहेत. या नदीच्या पाण्यात मृत मासे तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली.

आपल्या मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये नैसर्गिक जलसंपदा फार मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु या जलसंपदा मात्र सद्यस्थितीत अतिशय बिकट अवस्थेमध्ये आहेत. वाढते शहरीकरण आणि त्या अनुषंगाने होणार प्रदूषण आता मुंबईसारख्या शहरांची डोकेदुखी होऊन बसले आहे. प्रदूषण रोखण्याकरता कोणतीही कठोर पावले सरकारकडून उचलली न गेल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे.

हे ही वाचा:
निलंबनाचे महाभारत…

ठाकरे सरकारने मार्शल पाठवून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला

अभिरूप विधानसभेतून घुमला ठाकरे सरकारच्या निषेधाचा सूर

ट्विटरला आता उच्च न्यायालयानेही झापले

अंबरनाथ तालुक्यातील टाहुलीच्या डोंगरातून उगम पावणारी मुखी गोवरी नदी सध्या दूषित पाण्याने भरलेली आहे. रासायनिक पाणी थेट नदीत सोडल्यामुळे नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच नुकताच पाहायला मिळाला. नदीच्या किनारी असलेल्या कारखान्यातील पाणी थेटनदीत सोडले जात आहे.

नदीचे पाणी रसानामुळे दूषित झाल्यामुळे याचा फटका शेतीला तर होणार आहेच. परंतु या नदीच्या पाण्यामध्ये अनेक गुरेही पाणी पिण्यास येतात. या नदीच्या १५ ते १७ किमीच्या अंतरात असलेल्या गावात या नदीचे पाणी शेती आणि गुरांसाठी वापरले जाते. या प्रदुषित पाण्यामुळे धोका वाढला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा