भारतीय रुपयाने बुधवारी मोठी उसळी घेत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तब्बल ६१ पैशांनी वाढ नोंदवली आणि दिवसअखेर तो ९४.५७ या पातळीवर बंद झाला. गेल्या काही दिवसांपासून सतत घसरणीचा सामना करणाऱ्या रुपयासाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे. रुपयातील या मजबुतीमागे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत ठरल्या आहेत. अमेरिके आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि डॉलरची मागणी काहीशी घटली. परिणामी, रुपयाला बळ मिळाले.
हे ही वाचा:
ममता बॅनर्जींना घंटातज्ज्ञ भेटले का?
सायबर गुन्ह्यांसाठी भारतीयांची तस्करी प्रकरणी नऊ ठिकाणी छापे
कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवर ९ मे रोजी शपथविधी
१० वर्षे चालू होता लैंगिक अत्याचार; नंतर बुर्का घालण्यासाठी दबाव
याचबरोबर कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घसरणही रुपयासाठी फायदेशीर ठरली. भारत हा मोठा तेल आयात करणारा देश असल्याने तेल स्वस्त झाल्यास देशाच्या आयात खर्चात घट होते. त्यामुळे रुपयावरचा दबाव कमी होतो आणि त्याला मजबुती मिळते. विशेष म्हणजे, याआधी रुपया सतत कमजोर होत होता. ५ मे रोजी तो ९५.४० या विक्रमी नीचांकी पातळीपर्यंत घसरला होता. त्यामुळे बाजारात चिंता निर्माण झाली होती. मात्र, बुधवारी परिस्थिती अचानक बदलली आणि रुपयाने मोठी रिकव्हरी केली. एका दिवसातील ही वाढ अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या वाढींमध्ये गणली जात आहे.
रुपयाच्या या मजबुतीचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीकडे वळल्याने बाजारात तेजीचे वातावरण तयार झाले. जागतिक पातळीवर ‘रिस्क-ऑन’ वातावरण निर्माण झाल्यामुळे भारतीय बाजारालाही त्याचा फायदा झाला.
तज्ज्ञांच्या मते, रुपयातील ही वाढ सध्या सकारात्मक संकेत देत असली तरी पुढील काळात त्याची दिशा आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे. कच्च्या तेलाच्या किंमती, परदेशी गुंतवणूकदारांचा कल आणि जागतिक राजकीय घडामोडी यावर रुपयाची पुढील वाटचाल ठरणार आहे. एकंदरीत, रुपयाने सध्या दमदार पुनरागमन केले असले तरी ही मजबुती टिकून राहण्यासाठी जागतिक परिस्थिती स्थिर राहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







