27.5 C
Mumbai
Friday, July 11, 2025
घरधर्म संस्कृतीआषाढी वारीतील घुसखोरी म्हणजे हिंदू धर्मावरील छुपे संकट

आषाढी वारीतील घुसखोरी म्हणजे हिंदू धर्मावरील छुपे संकट

वारकऱ्यांनी सावध राहण्याची गरज

Google News Follow

Related

पंढरीची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, तर ती महाराष्ट्राच्या ८०० वर्षांहून अधिक जुन्या हिंदू परंपरेचा, भक्तीचा आणि सामाजिक एकात्मतेचा जिवंत अविष्कार आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासारख्या महान संतांनी या परंपरेला एका अशा उंचीवर नेले, जिथे जात, पंथ किंवा सामाजिक स्तराचा कोणताही भेद उरत नाही. लाखो वारकरी ‘माऊली’ या एकाच नात्याने विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने शेकडो किलोमीटरची पायपीट करतात, मात्र ही सहिष्णु आणि सर्वसमावेशक हिंदू परंपरा आज एका ढोंगी आणि कपटी आक्रमणाचा सामना करत आहे.
एकीकडे काही मुस्लिम आणि ख्रिस्ती संघटना वारकऱ्यांच्या मार्गात पाणी आणि अन्न वाटून ‘सेक्युलॅरिझम’ आणि ‘सामाजिक सलोख्या’चा देखावा निर्माण करतात. या कृतीला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देऊन एक सकारात्मक वातावरण निर्माण केले जाते, ज्यामुळे हिंदू समाज गाफील राहतो. पण याच सेवेच्या मुखवट्याआड मुस्लीम हे हिंदू श्रद्धेवर हल्ले करतात. पुण्यामध्ये नसीमा शेख या मुस्लिम महिलेने वारकऱ्यांवर मांसाचे तुकडे फेकून त्यांच्या श्रद्धेची विटंबना केली. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी व्यसनमुक्तीच्या नावाखाली बायबलची पत्रके वाटून धर्मांतराचा अजेंडा राबवला. हा विरोधाभास म्हणजे एक दुहेरी रणनीती आहे. एका बाजूला सेवेचे ढोंग करून विश्वास संपादन करायचा आणि दुसरीकडे त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन हिंदू धर्माच्या मुळावर घाव घालायचा.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा