29 C
Mumbai
Sunday, November 9, 2025
घरधर्म संस्कृतीअयोध्येत दीपोत्सवाचा जागतिक विक्रम; सरयू तीरावर २६ लाख दिवे

अयोध्येत दीपोत्सवाचा जागतिक विक्रम; सरयू तीरावर २६ लाख दिवे

योगी आदित्यनाथ यांनी केले कौतुक

Google News Follow

Related

भगवान श्रीरामांची नगरी अयोध्या पुन्हा एकदा प्रकाशमय झाली आहे. चोटी दिवाळीच्या दिवशी (रविवार, 19 ऑक्टोबर) अयोध्येने इतिहास रचला, कारण येथे सरयू नदीच्या तीरावर तब्बल 26 लाखांहून अधिक मातीचे दिवे (26,17,215) पेटवून एकाच वेळी दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रस्थापित करण्यात आले.

या ऐतिहासिक कार्यक्रमानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र स्वीकारले.

दीपोत्सवात २६.१७ लाख दिव्यांचा विक्रम

हा भव्य दीपोत्सव सरयू नदीच्या किनाऱ्यावरील “राम की पैडी” येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम उत्तर प्रदेश पर्यटन विभाग आणि अयोध्या जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे आयोजित केला होता.
या अंतर्गत दोन जागतिक विक्रम नोंदवले गेले —

तेलाचे सर्वाधिक दिवे एकाच वेळी लावणे, आणि एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी आरती करणे.

या दिव्योत्सवाने अयोध्येच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा जागतिक स्तरावर प्रत्यय दिला. हजारो लोक सरयू नदीच्या तीरावर “राम की पैडी” येथे या भव्य सोहळ्यासाठी एकत्र जमले.

लेझर शो, रामलीला आणि ड्रोन शोने सजली रामनगरी

राम की पैडी परिसर अप्रतिम लेझर आणि लाईट शोने उजळून निघाला. याच ठिकाणी, धार्मिक परंपरेनुसार, भगवान श्रीरामांनी निर्वाण प्राप्त केले असे मानले जाते. असंख्य दिव्यांच्या तेजात रामलीलेचे भव्य सादरीकरण करण्यात आले.

त्यानंतर अविश्वसनीय ड्रोन शो ने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, तर आकाशात चमकणाऱ्या फटाक्यांनी संपूर्ण परिसर दूधासारखा उजळवला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः या सोहळ्यात उपस्थित होते आणि विक्रम जाहीर झाल्यावर त्यांनी विजयी मुद्रेने दोन्ही हात उंचावून जनतेचे अभिनंदन स्वीकारले.

हे ही वाचा:

राज ठाकरेंचे हातपाय का गळाले?

ऑटोमोबाइल निर्यात १६.८५ लाख युनिट्सच्या पलीकडे

देशाचा निर्यात दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक

फुलांनी नटली अयोध्या नगरी

विक्रम प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले,  “प्रत्येक दिवा आपल्याला स्मरण करून देतो की सत्याला त्रस्त केले जाऊ शकते, पण त्याचा पराभव करता येत नाही. सत्याचे अंतिम गंतव्य विजयच आहे. सनातन धर्माने ५०० वर्षे या विजयाच्या प्रवासासाठी सातत्याने संघर्ष केला आणि त्या संघर्षाचे फलित म्हणजे आज अयोध्येत उभे राहिलेले हे भव्य आणि दिव्य मंदिर आहे.”

तसेच त्यांनी पुढे म्हटले, दीपोत्सवाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ‘डबल इंजिन सरकार’ स्थापनेनंतर आम्ही सातत्याने प्रयत्न केले की राज्यातील नागरिकांच्या श्रद्धेशी कोणीही खेळ करू नये आणि त्यांच्या ओळखीशी कोणताही तडजोड होऊ नये.”

२०१७ पासून योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येतील दीपोत्सव दरवर्षी नव्या उंचीवर पोहोचत आहे.
या प्रकाशोत्सवाने अयोध्या आणि गोरखनाथ पीठामधील सांस्कृतिक नाते अधिक दृढ केले आहे.

ही सातत्यपूर्ण वाढ अयोध्येच्या समृद्धीचा आणि सांस्कृतिक चेतनेचा प्रतीक मानली जात आहे. या सोहळ्यामुळे अयोध्या आध्यात्मिकतेबरोबरच पर्यटन, अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचे केंद्रस्थान बनत चालली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
280,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा