33 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024
घरदेश दुनियाभारताशी व्यापार करायला तालिबान उत्सुक

भारताशी व्यापार करायला तालिबान उत्सुक

Google News Follow

Related

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध यापुढे कसे असणार याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात होते. दोन दिवसांपूर्वी अशी माहिती मिळाली होती की, भारत सरकार अफगाणिस्तानच्या नवीन तालिबान राजवटीशी संपर्क साधेल. आता तालिबाननेही भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तालिबानचे नेते मौलवी झियाऊल हक्कमल यांनी म्हटलं की, भारत आमचा शत्रू नाही आणि आम्हाला भारताशी चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत असं तालिबानने माध्यमांना सांगितले.

यापूर्वीही तालिबानने असे संकेत दिले होते जेव्हा तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्तनिकजाई म्हणाले होते की भारत हा या क्षेत्रातील एक महत्त्वाचा देश आहे आणि आम्हाला भारतासोबत चांगले व्यापार आणि आर्थिक संबंध हवे आहेत.

मौलवी झियाऊल हक्कमल यांच्या वक्तव्यावरून आता हे स्पष्ट झाले आहे की, तालिबानच्या किमान एका मोठ्या आणि प्रभावशाली गटाला याची जाणीव आहे की भारताने अफगाणिस्तानात अनेक विकास कामे केली आहेत. कदाचित भारत हा एकमेव देश आहे जो अफगाणिस्तानमध्ये प्रामाणिकपणे हिताची कामे करत आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेत कोविडचा पुन्हा धुमाकूळ

अमेरिकेच्या रॉकेटने काबुल विमानतळावरील अनर्थ टळला

औरंगजेब म्हणत आहे, इम्रान खान सरकार खोटारडे

‘या’ शिवसेना खासदारावर ईडीचे छापे

अमेरिकन सरकार तालिबानला औपचारिक मान्यता देण्याच्या बाजूने नाही. डेमोक्रेटिक पक्षाचे वरिष्ठ सिनेटर ख्रिस मर्फी म्हणाले की अफगाणिस्तानमधील विरोधी शक्तींना मान्यता देणे ही चांगली कल्पना नाही. कारण ते प्रत्यक्षात देश चालवत नाहीत. मर्फी यांनी पुढे म्हटलं की, अमेरिका तालिबानला मान्यता देत नसेल तरीही तालिबानच्या एका गटाशी बोलले पाहिजे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
141,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा