30 C
Mumbai
Wednesday, December 17, 2025
घरधर्म संस्कृतीकाशी, अयोध्येनंतर आता मथुरेच्या विकासाची वेळ आली आहे!

काशी, अयोध्येनंतर आता मथुरेच्या विकासाची वेळ आली आहे!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला विश्वास

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या एक दिवसीय दौर्‍यात मथुराच्या बरसाना येथे ‘रंगोत्सव २०२५’ चे उद्घाटन केले. काशी आणि अयोध्येचा चेहरामोहरा बदलल्यानंतर आता मथुरा आणि ब्रजभूमीच्या विकासाची वेळ आली आहे. बरसानामध्ये आयोजित कार्यक्रमात सीएम योगींनी श्री लाडली जी महाराज मंदिरात दर्शन-पूजन केले आणि फुलांची व लड्डूमार होळी खेळून रंगोत्सवाची सुरुवात केली.

त्यांनी म्हटले की, ५ हजार वर्षांपासून भारताच्या सनातन संस्कृतीला ऊर्जा देणारी ही ब्रजभूमी श्रद्धा आणि आस्थेची भूमी आहे. ह्या भूमीच्या कणाकणात श्री राधा आणि श्रीकृष्ण यांचे दर्शन होते. उत्तर प्रदेशचे भाग्य आहे की, येथे काशी, अयोध्या आणि मथुरा ही तीनही तीर्थक्षेत्रे सनातन एकतेचे प्रतीक म्हणून उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वारसा आणि विकासाची नवी परंपरा स्थापित झाली आहे, ज्याचे परिणाम नुकत्याच पार पडलेल्या प्रयागराज महाकुंभाच्या भव्य आयोजनाच्या रूपात दिसून आले. जे जितके सनातन धर्माविरुद्ध बोलत होते, अफवा पसरवत होते आणि तर्कहीन गोष्टी करत होते, त्यांना सनातन धर्मीयांनी महाकुंभाच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे. महाकुंभ सनातन धर्माचा दुर्लभ क्षण बनला आहे.

सीएम योगींनी होळीला एकतेचे सूत्र मानत सांगितले की, होळी हा आपसी सौहार्द आणि दुरावा मिटवणारा सण आहे. महाकुंभाने जिथे जगाला एकतेचा संदेश दिला, तिथे होळी हा सणही एकतेच्या संदेशाला बळ देतो. त्यांनी बरसानाच्या विश्वप्रसिद्ध लठ्ठमार होळी आणि लड्डूमार होळीचा उल्लेख करत सनातन धर्माच्या अद्भुत परंपरांचे कौतुक केले.

हे ही वाचा:

अलिगढ मुस्लिम विद्यापीठात होळी साजरी करण्यास विरोध करणे संतापजनक!

महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांतील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात

मुंबई काँग्रेस कार्यालयाचे १८ लाख भाडे, ५ लाखांचे वीज बिल थकले, आता टाळे लागणे बाकी!

गोव्यात मारामारीवरून अबू आझमी यांच्या मुलावर गुन्हा

ते म्हणाले की, यावेळच्या अर्थसंकल्पात ब्रजभूमीच्या विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. कोट्यवधींच्या योजनांसह बरसानाला विकासाशी जोडले जात आहे. पहिल्यांदाच बरसानामध्ये रोपवेची सुविधा सुरू झाली आहे. महाकुंभ यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर आता मोकळीक मिळाली आहे. काशी, अयोध्या, प्रयागराज, मां विंध्यवासिनी धाम यांच्या विकासानंतर आता या पुण्यभूमीची वेळ आली आहे. मथुरा, बरसाना, ब्रजभूमीच्या विकासासाठी कोणतीही मर्यादा नाही. ते होळीच्या निमित्ताने श्री राधाराणी यांच्या श्रीचरणी हेच निवेदन घेऊन आले आहेत.

त्यांनी दिल्लीमध्ये रामभक्तांची सत्ता आल्याचे सांगत यमुना नदीच्या संरक्षणाचे वचन पुन्हा दिले. सीएम योगी म्हणाले की, आता यमुना माईही गंगा माईप्रमाणेच निर्मल होतील. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी संतांचा सन्मान केला आणि देश-विदेशातून आलेल्या लोकांना होळी आणि रंगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

ते म्हणाले की, बरसाना हे ब्रह्माचे, नंदगाव हे शिवाचे आणि गोवर्धन हे विष्णूचे प्रतीक आहे. ही ब्रजभूमी प्रत्येक सनातन धर्मीयासाठी आशीर्वादाचे केंद्र आहे. डबल इंजिनची सरकार सुरक्षा, विकास आणि समृद्धीची हमी आहे. होळीच्या या पवित्र प्रसंगी ब्रजभूमीच्या विकासाला नवी गती मिळेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा