32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणमुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी

मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी

योजनेची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Google News Follow

Related

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २५१ किलोमीटरच्या २०७ कोटींच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. यासोबतच पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा क्र. तीन मधून २६५ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी दोनशे कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांचा समावेश आहे. या योजनेची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दोन वर्षे ही योजना काही लोक राबवू शकले नाहीत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्कळ राबवली आहे, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्याला एकूण ४०७ कोटींचा निधी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकास कामांसाठी मिळणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील म्हणजे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचा विकास होणार आहे. रत्नागिरी शहरासह अन्य रस्त्यांच्या कामालाही १०० कोटी निधी मिळणार आहेत.

उदय सामंत म्हणाले, दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच ही योजना राबवली जाणार आहे. जिल्ह्याचा टप्पा दोनमध्ये २०२२-२३ मध्ये ही कामे होणार आहेत. तसेच केंद्र शासनाची पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा तीन मध्येही शिथिलता आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २६५ कि.मी.चेच रस्ते घेतले जाणार असून, त्यासाठी २०० कोटी निधीला मंजुरी मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे ही वाचा:

संजय राऊत फडणवीसांना भेटणार; मातोश्रीवर संशयाचा ९ किमी लांबीचा ढग

मुंबई-बर्मिंगहॅम विमानसेवा हवीय!

भारताचा पराभव; आठवण आली धोनीची

सर्वाधिक रुंदीचा मिसिंग लिंक बोगदा तयार होतोय

तत्कालीन सरकारने २०१९ पासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम थांबले होते. हे पाप कोणाचे आहे, माहिती नाही. परंतु ते काम सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असंही उदय सामंत यावेळी म्हणाले.

या योजनेतून जिल्ह्यात २५१ किलोमीटरच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मंडणगड १२.५ कि.मी., दापोली २६.२५ कि.मी., खेड २९ कि.मी., गुहागर २१, चिपळूण ३१, संगमेश्वर ३७, रत्नागिरी ३३, लांजा २६ आणि राजापूर तालुक्यात ३५.१६ कि.मी.चे उद्दिष्ट आहे. २ वर्षांनंतर समितीने योजनेला मंजुरी दिली आहे. मंडणगड तालुक्यासाठी ९ कोटी, खेड १०, दापोली १९ कोटी, गुहागर १६.५० कोटी, चिपळूण २३.२५ कोटी, संगमेश्वर २५ कोटी, रत्नागिरी २५ कोटी, लांजा १८ कोटी, राजापूर २६ कोटी असा एकूण २०७ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा