28.2 C
Mumbai
Sunday, June 22, 2025
घरराजकारणवडेट्टीवार भरकटले; म्हणाले १५ हजारांच्या ड्रोनसाठी १५ लाखांचे क्षेपणास्त्र वापरले!

वडेट्टीवार भरकटले; म्हणाले १५ हजारांच्या ड्रोनसाठी १५ लाखांचे क्षेपणास्त्र वापरले!

पुन्हा केले वादग्रस्त विधान

Google News Follow

Related

ऑपरेशन सिंदूरसंबंधी राजकीय वादविवाद सुरूच आहे. काँग्रेसकडून ऑपरेशन सिंदूरवर सातत्याने वादग्रस्त विधाने केली जात आहेत. आता महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी नागपूरमध्ये सांगितलं की, भारताने पाकिस्तानच्या १५,००० रुपये किमतीच्या ड्रोनला पाडण्यासाठी १५ लाख रुपयांची क्षेपणास्त्र वापरली. यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावं.

काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणाले की, पाकिस्तानने चीनमध्ये बनवलेले ५,००० ड्रोन पाठवले. प्रत्येक ड्रोनची किंमत १५,००० रुपये होती. अशा ड्रोनना नष्ट करण्यासाठी आपण १५ लाख रुपये खर्च करून क्षेपणास्त्र डागली. हे चीनच्या धोरणाचा एक भाग आहे. चर्चा अशी देखील आहे की आपल्या ३-४ राफेल जेट्सना पाडण्यात आलं. त्यामुळे सरकारने ऑपरेशन सिंदूरसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे.

हे ही वाचा:

किरीट सोमय्यांना धमकी देणारा युसुफ अन्सारी तडीपार

पाकच्या मदतीने चीनचा नवा डाव; CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार

ममता बॅनर्जी यांनी माफी मागावी

दक्षिण कोरिया: ली यांनी माजी राष्ट्रपती यून यांच्यावर का साधला निशाणा

वडेट्टीवार म्हणाले की, जर कोणी युद्ध लहान की मोठं, किती नुकसान झालं, अमेरिका सांगत होतं म्हणून युद्ध थांबवलं का – असं विचारत असेल, तर त्यात चुकीचं काय आहे? जनतेला माहिती घेण्याचा अधिकार आहे की ऑपरेशन सिंदूरमध्ये काय निर्णय घेण्यात आले? किती खर्च झाला आणि त्याचा काय परिणाम झाला? यावर सरकारने उत्तर द्यावं.

मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रतिहल्ला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं की, “जसं मी आधीही सांगितलं होतं, मूर्खांना काय सांगायचं? काँग्रेसच्या नेत्यांना काहीच फरक कळत नाही – शेतकरी शेतात वापरतो त्या ड्रोनमध्ये आणि लढाऊ ड्रोनमध्ये काय फरक आहे, हेच त्यांना कळत नाही. मग अशा लोकांना काय उत्तर द्यायचं? काँग्रेसचं एकमेव काम म्हणजे भारतीय सैन्याचं मनोबल तोडणं.”

वडेट्टीवरानी पूर्वीही केलं होतं विधान

याआधी विजय वडेट्टीवार म्हणाले होते की,  सरकारने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घ्यायला हवी. ते म्हणाले होते की दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारून त्यांना ठार मारलं. दहशतवाद्यांकडे हे सगळं विचारायचा वेळ असतो का? काही लोक म्हणतात की असं काही झालंच नाही. दहशतवाद्यांना कोणतीही जात किंवा धर्म नसतो. जबाबदार व्यक्तींना ओळखा आणि योग्य ती कारवाई करा. ही देशाची भावना आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
252,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा