आसामचे माजी मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांची रविवारी, १० मे रोजी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाचे आणि एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. यानंतर एनडीएचे नेते रविवारीच लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.
हिमंता बिस्वा सरमा १२ मे रोजी आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अनेक केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधीही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
भाजपची सलग तिसरी सत्ता
२०२६ च्या आसाम विधानसभा निवडणुकीत भाजप-नेतृत्वाखालील एनडीएने दोन-तृतीयांश बहुमतासह सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली.
१२६ सदस्यीय विधानसभेत: भाजप – ८२ जागा
आसाम गणपरिषद (एजीपी) – १० जागा
बोडोलँड पीपल्स फ्रंट – १० जागा
हे ही वाचा:
अशी गाठली चांदीने ऐतिहासिक उंची
‘ऐसा कोई सगा नहीं, जिसे काँग्रेसने ठगा नहीं’
स्पेनमध्ये पोहोचले हंताव्हायरसग्रस्त लक्झरी क्रूझ जहाज
तामिळनाडूत विजय यांचे सरकार येण्याचा मार्ग झाला मोकळा
विधिमंडळ पक्षाची बैठक
भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक रविवारी सकाळी पार पडली. या बैठकीत नवीन नेत्याची निवड करण्यात आली, जो राज्यातील पुढील सरकारचे नेतृत्व करणार आहे. बैठकीला जे पी नड्डा आणि नायब सिंग सैनी हे केंद्रीय निरीक्षक आणि सह-निरीक्षक म्हणून उपस्थित होते. याशिवाय, विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, राज्य भाजप अध्यक्ष दिलीप सैकिया आणि नव्याने निवडून आलेले सर्व भाजप आमदार बैठकीला उपस्थित होते.
भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीला आता एजीपी आणि बोडोलँड या मित्रपक्षांचीही औपचारिक मंजुरी मिळणार आहे.
शपथविधी खानापारा येथे
राज्याचे मुख्य सचिव रवी कोटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा व्हेटरनरी फिल्ड येथे आयोजित करण्यात येणार आहे. दरम्यान, हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला होता. मात्र राज्यपालांनी त्यांना कार्यवाह मुख्यमंत्री म्हणून काम सुरू ठेवण्यास सांगितले होते.
गौरव गोगोईंवर आरोप
निवडणुकीदरम्यान हिमंता बिस्वा सरमा यांनी गौरव गोगोई यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते. सरमा यांनी दावा केला की, गोगोई यांनी या आरोपांविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही, त्यामुळे त्यांच्या आरोपांना आधार असल्याचे त्यांनी सूचित केले. तसेच, त्यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले होते.







