30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरराजकारणजयंतराव...क्या हुआ तेरा वादा?

जयंतराव…क्या हुआ तेरा वादा?

Google News Follow

Related

महिलांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना फैलावर घेतले आहे. दारूबंदीच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांचा विरोधी पक्षात असतानाच्या एका भाषणाचा व्हिडिओ चित्रा ताईंनी सोशल मीडियावर टाकत जयंत पाटलांना ‘क्या हुआ तेरा वादा’ असे म्हणत सवाल केला आहे.

गुरुवार, २७ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारकडून चंद्रपूर मधील तळीरामांसासाठी एक खुशखबर जाहीर करण्यात आली. २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात लागू असलेली दारू बंदी उठवण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा विरोध झुगारून हा दारूबंदी हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध

चंद्रपूरनंतर ‘या’ जिल्ह्यातील दारूबंदी उठवणार

गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव

हॉस्पिटलचा धंदा चालावा म्हणून लस खरेदी केली नाही?

याच दारूबंदी हटवण्याच्या मुद्द्यावरून भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष चित्रा वाघ आल्या दिवशी ठाकरे सरकारवर तोफ डागत आहेत. शनिवारी त्यांनी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि ठाकरे सरकार मधील महत्त्वाचे मंत्री जयंत पाटील यांचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.

या व्हिडिओत जयंत पाटील हे असे सांगताना दिसत आहेत की ‘आमचे सरकार आले की कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय यवतमाळमध्ये दारूबंदीचा घेतला जाईल.’ तसे आश्वासन त्यांनी यवतमाळमधील महिलांना दिले आहे. यावरूनच चित्रा वाघ यांनी ‘क्या हुआ तेरा वादा’ असा सवाल केला आहे. तर महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असंच खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा