केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सुपौलच्या निर्मली येथे झालेल्या निवडणूक सभेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवर तीव्र निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की राहुल गांधी बिहारमध्ये घुसखोरांना वाचवण्यासाठी यात्रा काढत आहेत. अमित शहा म्हणाले, “आम्ही बिहारमधून पुढील पाच वर्षांत सर्व घुसखोरांना एक-एक करून बाहेर काढू. घुसखोरांना मतबँक बनवणारे महाठगबंधन बिहारचे कधीच भले करू शकत नाही.” महिला सशक्तीकरण योजनेचा उल्लेख करताना शहा म्हणाले की, “मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत बिहार सरकारने महिलांच्या खात्यात १० हजार रुपये जमा केले आहेत, पण राजदचे नेते त्यालाही विरोध करत आहेत. मी बिहारच्या जनतेला आश्वासन देतो — ही रक्कम कोणीही काढू शकत नाही.” शहा यांनी एनडीए सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना सांगितले की, “मिथिलांचलचा सन्मान एनडीए सरकारने केला आहे. मैथिली भाषा आठव्या अनुसूचीत समाविष्ट केली गेली, संविधानाचा मैथिली भाषेत अनुवाद करण्यात आला, तसेच मैथिली पागवर टपाल तिकीट जारी करण्यात आले. गुजरातमध्ये ‘शाश्वत मिथिला महोत्सव’ही आयोजित झाला.”
ते पुढे म्हणाले, “जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देणे आणि मखाना बोर्डाची स्थापना — हे देखील एनडीए सरकारचेच कार्य आहे.” राजदच्या सत्ताकाळावर टीका करताना शहा म्हणाले, “बिहारमधील जनता आजही त्या जंगलराजच्या दिवसांना विसरलेली नाही. पण नीतीश कुमार यांनी तो जंगलराज संपवला.” ते म्हणाले, “त्या काळात संध्याकाळी पाचनंतर मातांना, बहिणींना आणि मुलींना घराबाहेर पडता येत नव्हते. पण मोदी सरकार आल्यावर ११ वर्षांत १ कोटी १७ लाख महिलांना गॅस कनेक्शन मिळाले, १.५० कोटी शौचालये बांधली गेली, ४८ लाख गरीबांना घरे मिळाली, आणि पुढील पाच वर्षांत आणखी ५० लाख घरे दिली जाणार आहेत.”
हेही वाचा..
‘राष्ट्रीय जनता दल मुलांना पिस्तुल देण्याची भाषा करतेय!’
‘निफ्टी मिडकॅप १५०, ‘निफ्टी ५०’ ठरले टॉप परफॉर्मर
समस्तीपुरमध्ये रस्त्याकडेला आढळल्या हजारो VVPAT चिठ्ठ्या आढळल्या
धर्मेंद्र प्रधानांची राहुल गांधींवर सडकून टीका
अमित शहा म्हणाले, “महागठबंधन सत्तेत आलं तर पुन्हा जंगलराज येईल, पण एनडीए बिहारला विकासाच्या मार्गावर नेईल.” सभेत बोलताना त्यांनी सीतामढीतील माता सीता मंदिराच्या उभारणीबाबतही घोषणा केली. ते म्हणाले, “माता सीतेच्या जन्मभूमीला भगवान श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्येशी ‘वंदे भारत’ ट्रेनद्वारे थेट जोडले जाईल.”







