भारताच्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या मनातील एक जळजळीत सत्य उघड केलंय — नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणं आता खूपच कठीण झालं होतं… म्हणूनच मी माघार घेतली.
एकेकाळचा अंडर-19 वर्ल्ड कप विजेता कर्णधार, नंतर भारताचा आक्रमक नेता, आणि आरसीबीचा चेहरा बनलेला कोहली म्हणतो —
“७–८ वर्ष भारतासाठी कर्णधार म्हणून खेळणं, ९ वर्ष आरसीबीची कप्तानी करणं… आणि दर वेळी माझ्यावर बॅटिंगची अपेक्षा! मैदानावर मी एकटा नव्हतो, पण ते प्रेशर माझं एकट्याचं होतं. हे सगळं सतत डोक्यावर होतं – २४x७.”
तो पुढे म्हणतो,
“एक क्षण असा आला, जेव्हा मी स्वतःलाच विचारलं – मी जर क्रिकेटमधून आनंद घेत नाही, तर मग राहून काय उपयोग? म्हणून मी नेतृत्व सोडलं… जेणेकरून मी पुन्हा खेळाचा आनंद घेऊ शकेन, लोकांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या समाधानासाठी खेळू शकेन.”
पण त्याचं आरसीबीशी असलेलं नातं हे कोणत्याही ट्रॉफीपेक्षा मोठं आहे –
“जे प्रेम मला चाहत्यांकडून मिळालं, ते कोणतीही ट्रॉफी देऊ शकत नाही. ती भावना कायमची सोबत राहील.”
मार्क बाउचरच्या सल्ल्याचंही विराटने खास कौतुक केलं:
“त्यांनी माझी कमजोरी – शॉर्ट बॉल – ओळखली आणि म्हणाले, ‘पुल शॉट नाही आला, तर इंटरनॅशनल क्रिकेट विसर.’ त्यांनी मला काम करतं ठेवलं, मार्गदर्शन केलं आणि एक वचन दिलं – ‘जर चार वर्षांनी मी तुला भारतासाठी खेळताना पाहिलं नाही, तर तुला स्वतःलाच धोका दिलाय.’”
गैरी कर्स्टन आणि एमएस धोनी यांच्या पाठिंब्यामुळे विराटला सुरुवातीलाच नंबर ३ वर खेळण्याची संधी मिळाली –
“माझं नैसर्गिक टॅलेंट इतरांसारखं नव्हतं. पण माझं निर्धार प्रचंड होता. मी काहीही करून संघासाठी खेळणार – हे त्यांनी पाहिलं आणि मला पाठिंबा दिला.”
कोहलीच्या या भावना आज लाखो क्रिकेटप्रेमींना भिडतील…
कारण नेतृत्व फक्त ट्रॉफीसाठी नसतं – ते मनापासून लढण्याचं दुसरं नाव असतं!