देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या आयआयटीच्या कॅम्पसमध्ये एक संशयास्पद प्रकार उघड झाला आहे. पवईतील या शिक्षणसंस्थेत बिलाल नावाचा एक तरुण दोन आठवडे मुक्काम ठोकून होता. देशातील आयआयटी या डीफेन्स टेक्नोलॉजी अर्थात संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील अग्रगण्य संस्था डीआरडीओ सोबत अनेक महत्वाच्या प्रकल्पांवर काम करतात. मुंबई आयआयटी याला अपवाद नाही. त्यामुळे इथे झालेली घुसखोरी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. बिलालच्या चौकशीत समोर आलेली माहिती लक्षात घेता, एक मोठा गेम उघड होण्याची शक्यता आहे.
