लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला लोकशाहीतील “गोंधळाचे ब्लूप्रिंट” असे संबोधले आहे. या निवडणुकीला “मॅच फिक्सिंग” म्हणणाऱ्या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर दिल्लीच्या भाजप खासदार कमलजीत सहरावत यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भाजप विकासाच्या अजेंड्यावर काम करते, म्हणूनच जनता आमच्या सरकारला सत्तेत आणते.
खासदार सहरावत म्हणाल्या की, “राहुल गांधी यांचे प्रत्येक वक्तव्य हे स्वतःमध्येच विचित्र असते. ते कधीच त्यांच्या पराभवाची जबाबदारी घेत नाहीत. कधीकाळी संपूर्ण देशावर राज्य करणारी काँग्रेस पक्ष आज संसदेतील तिसऱ्या क्रमांकासाठीही संघर्ष करत आहे. हे स्पष्टपणे पक्षाच्या विचारसरणीत व कार्यपद्धतीतील त्रुटी दाखवते.” “राहुल गांधी निवडणुकीच्या काळात देशात नसतात आणि जेव्हा ते परदेशात असतात, तेव्हा देशाविरुद्ध वक्तव्य करतात. काँग्रेस पक्ष जर सतत निवडणुका हरत असेल, तर ती त्यांच्याच कमतरतांमुळे होत आहे. भाजप विकासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जाते. लोक मतदान करतात आणि सरकार बनते,” असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा..
मुला-मुलींची राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी पुण्यात
उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो!
विशाळगडावर बकऱ्यांच्या कुर्बानीस बंदीनंतर साखर वाटून आनंद साजरा
महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये ‘मॅचफिक्सिंग’; राहुल गांधींचा तोच शिळा आरोप
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एका लेखाचा फोटो शेअर केला. त्यांनी लिहिले – “२०२४ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही लोकशाहीतील धांदळीचा ब्लूप्रिंट होती. माझ्या लेखामध्ये मी तपशीलवार पद्धतीने मांडले आहे की ही एक साजिश कशी टप्प्याटप्प्याने रचली गेली. निवडणूक आयोगाची नियुक्ती करणाऱ्या पॅनेलवर नियंत्रण मिळवले गेले. मतदार यादीत बनावट मतदार समाविष्ट करण्यात आले. मतदान टक्केवारी वाढवून दाखवण्यात आली. जिथे भाजपला विजय मिळवून द्यायचा होता, तिथे टार्गेट करून बनावट मतदान झाले. पुरावे लपवले गेले.
हे समजणे फार कठीण नाही की महाराष्ट्रात भाजप इतकी बिथरलेली का होती. पण निवडणुकीतील धांदळी हीसुद्धा मॅच फिक्सिंगसारखीच असते. जो पक्ष फसवणूक करतो, तो कदाचित निवडणूक जिंकू शकतो, पण त्यामुळे लोकशाही संस्था दुर्बल होतात आणि जनतेचा निकालांवरचा विश्वास उडतो. महाराष्ट्रातील ही मॅच फिक्सिंग आता बिहारमध्येही पुन्हा होईल, आणि तिथेही जिथे जिथे भाजप हरताना दिसेल. फिक्स केलेली निवडणूक ही लोकशाहीसाठी विषसमान आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
