27 C
Mumbai
Friday, June 13, 2025
घरविशेषमंडपातून वराचं अपहरण !

मंडपातून वराचं अपहरण !

Google News Follow

Related

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अजब घटना घडली आहे. नाचाच्या वादातून लग्न मंडपातून थेट वराचं अपहरण करण्यात आलं. पोलिसांनी तपास सुरू केला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बैकुंठपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघवा दुबौली गावातील सुरेंद्र शर्मा यांच्या मुलीचं लग्न होतं. वधूसाठी बारात साधू चौक मोहल्ल्यात आली होती आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. लग्नाच्या सर्व विधी सुरू होत्या. या दरम्यान, वरातीत मनोरंजनासाठी ‘नाच पार्टी’ बोलवण्यात आली होती.

मात्र नाचाच्या कार्यक्रमादरम्यान गावातील काही तरुणांशी वाद झाला. वाद इतका वाढला की दोन्ही गटांमध्ये जोरदार मारहाण झाली. त्यानंतर नाच पार्टीतील काही सदस्य थेट वधूच्या घरी गेले आणि तिथे गोंधळ घालायला सुरुवात केली. आरोप आहे की नाच पार्टीतील लोकांनी वधू आणि तिच्या कुटुंबीयांवर हात उगारणे, मारहाण करणे आणि घरातील दागदागिने व मौल्यवान वस्तू लुटल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा..

नाभवर नियमित तेल लावल्याने काय फायदा ?

एम्सच्या डॉक्टरसह दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह

अभिनेते मुकुल देव यांचे निधन

तेंदूफळ उत्पन्न आणि आरोग्याचा खजिना

जेव्हा वराने हा वाद मिटवायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचं अपहरण करण्यात आलं. याबाबत पोलीसांना तत्काळ माहिती देण्यात आली. या घटनेमुळे वधूच्या कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि काही अनर्थ घडू नये याची चिंता व्यक्त केली जात आहे. गोपालगंज (सदर) चे एसडीपीओ प्रांजल त्रिपाठी यांनी सांगितलं की, पोलीस प्रकरणाची गंभीरतेने तपासणी करत आहेत. वराचा शोध घेण्यासाठी गोपालगंजसह बरौली आणि सिवान पोलीसांचीही मदत घेतली जात आहे. त्यांनी सांगितलं की, वधूच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला असून स्थानिक नागरिक प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा