पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर संस्था आणि सुरक्षा दलांना बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवर उच्च सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारवाया आणि पाकिस्तानच्या आयएसआय आणि पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची वाढती उपस्थिती लक्षात घेता बांगलादेश सीमेवर एजन्सींना अतिरिक्त सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, पाकिस्तान आपल्या बांगलादेशी समकक्ष म्हणजेच त्यांच्या सारखे समान असलेले आणि तेथील कट्टरपंथी इस्लामी गटांशी संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व निर्माण झाल्यास भारतासाठी समस्या निर्माण करण्यासाठी पाकिस्तान बांगलादेशच्या सीमेवरील भारतीय भागात पाठिंबा असलेल्या या कट्टरपंथी घटकांचा वापर करण्याची शक्यता आहे.