डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला. ३३९ धावांचे अवघड लक्ष्य पाठलाग करताना भारताने ५ विकेट्सने सामना जिंकत महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा सामना आता २ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
या विजयासह भारताने महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वात मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग (चेज) करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आजवर केवळ तीन वेळा महिला क्रिकेटमध्ये ३०० हून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या पार करण्यात आले आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२५, उपांत्य सामना)
पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४९.५ षटकांत ३३८ धावा केल्या.
फोएबे लिचफिल्डने ९३ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि १७ चौकारांसह ११९ धावा ठोकल्या, तर एशले गार्डनरने ४५ चेंडूंमध्ये ६३ धावा जोडल्या.
भारताकडून श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात भारताने ४८.३ षटकांत ५ विकेट्स गमावून लक्ष्य पार केले.
जेमिमा रॉड्रिग्जने १३४ चेंडूंमध्ये १४ चौकारांसह नाबाद १२७ धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ८८ चेंडूंमध्ये ८९ धावा झळकावल्या.
दोघींनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची महत्त्वाची भागीदारी केली.
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका (१७ एप्रिल २०२४)
दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ५ बाद ३०१ धावा केल्या.
कर्णधार लौरा वोल्वार्ड्टने १४७ चेंडूंमध्ये नाबाद १८४ धावा फटकावल्या.
परंतु प्रत्युत्तरात श्रीलंकेने केवळ ४४.३ षटकांत ६ विकेट्स राखून ३०२ धावा करत सामना जिंकला.
कर्णधार चामरी अथापथूने १९५ नाबाद धावा करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (१२ ऑक्टोबर २०२५)
भारताने ४८.५ षटकांत ३३० धावा केल्या होत्या.
यानंतर ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांत ७ विकेट्स गमावून ३३१ धावा करत सामना आपल्या नावावर केला होता.ॉ
हेही वाचा :
आणखी एक शीश महाल? केजरीवालांची पंजाबमध्ये ‘आलिशान ७ स्टार हवेली’
अलीगढ: मंदिरांवर “आय लव्ह मोहम्मद” लिहिताना स्पेलिंग चुकले आणि पोलिसांनी पकडले
श्रीराम जन्मभूमीला आतापर्यंत ₹३ हजार कोटींचे दान; ध्वजरोहण सोहळ्यात दानदात्यांना विशेष आमंत्रण!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून आदरांजली
भारताचा हा विजय केवळ एका सामन्याचा निकाल नाही, तर महिला क्रिकेटमधील नव्या युगाची सुरुवात मानली जात आहे.
जेमिमा आणि हरमनप्रीतच्या या जोडीने दाखवून दिलं की ‘चेज’ म्हणजे फक्त धावा नाहीत — तो एक जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा प्रवास असतो.







