भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटपटू पती विराट कोहली यांनी भारतीय सैन्याचे आभार मानले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या काळात देशाचे रक्षण करण्यासाठी भारतीय संरक्षण दलांच्या प्रयत्नांचे कौतुक करत या जोडप्याने भारतीय सैन्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
कर्नल अजय कुमार शर्मा यांची मुलगी-अभिनेत्री अनुष्का शर्माने भारतीय सशस्त्र दलांचे आभार मानले आणि त्यांना खरे ‘नायक’ म्हटले. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्टकरत म्हटले, ‘या कठीण काळात आपले रक्षण करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांचे आपण नेहमीच आभारी राहू. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या त्यागाबद्दल मनापासून कृतज्ञता. ‘जय हिंद.’ अनुष्का शर्माच्या पोस्टवर तिचा पती विराट कोहलीने लगेच प्रतिक्रिया दिली ‘जय हिंद’ म्हटले.
अनुष्कानंतर विराट कोहलीने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अशीच एक पोस्ट शेअर केली आणि भारतीय सैन्याला पाठिंबा देताना त्यांचे आभार मानले. विराट कोहलीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, ‘आम्ही आमच्या सशस्त्र दलांसोबत एकजुटीने उभे आहोत आणि या कठीण काळात आमच्या देशाचे रक्षण केल्याबद्दल त्यांना सलाम करतो.
हे ही वाचा :
जम्मू काश्मीरच्या कर्तव्यावर असलेले घाटकोपरचे मुरली नाईक हुतात्मा
“भारतीय ड्रोन रोखले नाहीत कारण…” पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे अजब स्पष्टीकरण
पाकिस्तानचे अल्लाह के नाम पे दे दे बाबा!
त्या नेत्याने S-400 अर्थात सुदर्शन चक्रसाठी केला होता हट्ट!
आपल्या खऱ्या नायकाच्या अटल शौर्याबद्दल आपण त्याचे कायम ऋणी राहू. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या महान देशासाठी दिलेल्या त्यागाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो, असे विराट कोहलीने पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारत जोरदार प्रत्युतर देत आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराने संयुक्त पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.