27.6 C
Mumbai
Tuesday, June 24, 2025
घरविशेषपाक दहशतवाद्यांनी भारताच्या "नारी शक्ती" ला आव्हान देऊन पायावर कुऱ्हाड मारली!

पाक दहशतवाद्यांनी भारताच्या “नारी शक्ती” ला आव्हान देऊन पायावर कुऱ्हाड मारली!

राणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भोपाळमध्ये भाषण

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी भारताच्या “नारी शक्ती” ला आव्हान देऊन स्वतःचा नाश घडवून आणला. भारताच्या इतिहासातील ‘सिंदूर’ ही सर्वात मोठी आणि यशस्वी दहशतवादविरोधी मोहीम असल्याचे त्यांनी म्हटले.

“पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी फक्त रक्त सांडले नाही तर त्यांनी आपल्या संस्कृतीवर हल्ला केला. त्यांनी आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी भारताच्या नारी शक्तीला आव्हान दिले आणि हे आव्हान दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या आकांसाठी विनाशात बदलले,” असे राणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भोपाळमध्ये ‘महिला सशक्तीकरण महासंमेलन’मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले.

युद्धादरम्यान, भारताने पाकिस्तानच्या आत खोलवर असलेल्या प्रमुख दहशतवादी तळांनाच उद्ध्वस्त केले नाही तर युद्धबंदी करार करण्यापूर्वी लष्करी तळांनाही लक्ष्य केले. भारताच्या सशस्त्र दलांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याने पाकिस्तानला आश्चर्याचा धक्का बसला.

“पाकिस्तानात शेकडो किलोमीटर घुसून हे छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्धच्या भारतीय इतिहासातील सर्वात मोठे आणि यशस्वी ऑपरेशन आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पाकला इशारा देत ते म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरने स्पष्टपणे जाहीर केले आहे की दहशतवादाच्या माध्यमातून प्रॉक्सी युद्ध आता सहन केले जाणार नाही. आता, आम्ही त्यांच्या घरांमध्येही हल्ला करू ( घर में घुस के मारेंगे ). जो कोणी दहशतवाद्यांना मदत करेल त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

हे ही वाचा :

“कोहलीनं ऐकलं मनाचं… डिविलियर्सच्या डोळ्यांतून कौतुकाचा झरा!”

ओडिशात खिडकीतून आली एकापाठोपाठ एक नोटांची बंडले!

ट्रम्प पुन्हा श्रेय घेण्याच्या नादात, भारत-पाक युद्धबंदीत मध्यस्थीचा केला दावा!

‘दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांना मोठी किंमत मोजावीच लागेल’

भारत-पाक युद्ध दरम्यान बीएसएफच्या मोठ्या कामगिरीचा आणि त्यातील महिला जवानांचा गौरव केला. म्हणाले, जर तुम्ही (पाक) गोळी चालविली तर गोळ्याने उत्तर दिले जाईल. ऑपरेशन सिंदूर आमच्या नारी शक्तीच्या सामर्थ्याचे प्रतिक बनले आहे. आज जग भारताच्या मुलींच्या संरक्षणातील ताकदीचे साक्षीदार आहे. आमच्या बीएसएफच्या मुली आमच्या सीमांचे रक्षण करत होत्या आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकला योग्य उत्तर देत होत्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
253,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा