पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आहे. या कारवाईअंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. आता या ऑपरेशनशी संबंधित सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी रौफ अझहरचा मृत्यू झाला आहे. कंदहार विमान अपहरणात दहशतवादी रौफ अझहरचा सहभाग होता.
भारताच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे मुख्य कमांडर या हल्ल्यात ठार झाले आहेत. याच दरम्यान, आता भारताला मोठे यश मिळाले आहे. दहशतवादी रौफ अझहर ठार झाला आहे. रौफ अझहर हा जैश-ए-मोहम्मद (जेईएम) प्रमुख मसूद अझहरचा भाऊ आहे.
मुरीदकेमध्ये भारतीय वायू दलाच्या हल्ल्यात तो गंभीर झाला होता आणि पाकिस्तानी लष्करी रुग्णालयात तो उपचार घेत होता. आज अखेर त्याचा मृत्यू झाला आहे. १९९९ सालच्या कंदहार विमान अपहरणात रौफ अझहरचा सहभाग होता. दरम्यान, दहशतवादी रौफने आपल्या भावाला भारतीय तुरुंगातून सोडवण्यासाठी हरकत-उल-मुजाहिदीन आणि आयएसआयसोबत मिळून विमान अपहरणाचा कट रचला होता. त्याने काठमांडूमध्ये या कारवाईची योजना आखली आणि त्याचा भाऊ इब्राहिम अथरसह अपहरणकर्त्यांशी समन्वय साधला. नंतर तो जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सक्रिय होता. तो भारतात ‘मोस्ट वॉन्टेड’ होता.
हे ही वाचा :
भारत कुणालाही छेडत नाही, जो छेडतो त्याला सोडत नाही
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानचा शेअर बाजार ढासळला
सेनाप्रमुखांनी लान्स नायक दिनेश कुमार यांच्या शौर्याला दिली सलामी
“कसोटी सिंहासन रिकामं – गिल की बुमराह?”
दरम्यान, भारताच्या कारवाईत जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा आणि चार जवळच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अझहरची मोठी बहीण, तिचा पती, त्याचा पुतण्या आणि त्याची पत्नी, आणखी एक भाची आणि पाच मुले, अझहरची आई आणि तीन प्रमुख सहकारी यांचा समावेश आहे.