गेले दोन दिवस महाराष्ट्रात त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेवरून हिंसाचार उसळलेला पाहिला मिळाला. महाराष्ट्राच्या विविध भागात मुस्लीम समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेला दिसला. पण आता त्रिपुरात कोणत्याही मशिदीची तोडफोड किंवा नुकसान झालेच नसल्याची माहिती पुढे येत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे या बाबतचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. मग त्रिपुरात जी आग लागलीच नाही त्याचा धूर महाराष्ट्रात का उडाला?