34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामा“उदयपूर हत्या घटनेनंतर स्वा. सावरकरांचे विचार आठवतात”

“उदयपूर हत्या घटनेनंतर स्वा. सावरकरांचे विचार आठवतात”

Google News Follow

Related

राजस्थानमधील उदयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची तलवारीने गळा चिरून हत्या करण्यात आली. हल्लेखोर मंगळवार, २८ जून रोजी भरदिवसा दुकानात घुसले आणि तलवारीने त्याच्यावर अनेक वार करून त्याचा गळा चिरला. आरोपींनी घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

यानंतर मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी उदयपूर हत्या प्रकरणाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. शरद पोंक्षे यांनी यांनी वि. दा. सावरकर यांनी लिहिलेल्या काही ओळींचा फोटो शेअर केला आहे. “प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरुन फिरु लागली तर आणि तरच कदाचित हा हिंदुस्तान जगू शकेल,” असं शेअर करत शरद पोंक्षे यांनी यांनी म्हटलंय की, “जे उदयपूरमध्ये घडलं ते पाहिल्यावर स्वा. सावरकर आणि त्यांचे विचार पदोपदी आठवतात. हिंदूंनो जागे व्हा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

हे ही वाचा:

बहुमत चाचणीत मनसेचा भाजपाला पाठिंबा

डोंबिवलीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

आम्ही उद्या मुंबईत येणार; कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

किशोरी पेडणेकरांना पून्हा त्याच नावाने धमकीचे पत्र

राजस्थानमधील उदयपूर येथे एका शिवणकाम व्यावसायिकाची काल हत्या करण्यात आली. त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने वार केले आणि या हल्ल्याची चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे खळबळ माजली होती. कन्हैया लाल तेली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचे दुकान होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा