महाभारतात शकुनी नावाचे पात्र आहे. कौरवांचा सख्खा मामा. कायम दुर्योधनाला चिथावणी देणारा खलनायक. शकुनी कौरव-पांडवांमध्ये तेढ निर्माण करत होता, ते त्याची बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे नव्हे. महाभारत झाले तर कुरुवंशाचा निप्पात
होणार हे त्याला ठाऊक होते. तेच त्याचे उद्दीष्ट होते. उबाठाचे प्रवक्ते, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने ज्या काड्या करत असतात, त्याचे परिणाम त्यांना
ठाऊक आहेत. परंतु ठाकरेंना जोपर्यंत पार बुडवत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, याची बहुधा त्यांनी शपथ घेतली असावी. कोणाला यावर विश्वास बसत नसेल तर त्यांची ताजी मुक्ताफळे ऐकावीत.
घराघरात आक्रोश असताना मोदी मुंबई दौऱ्यावर येतात. मोदी फिरतायत, त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नाही. तुम्हील लढा आम्ही कपडे सांभाळतो, अशी मोदींची भूमिका आहे. पुलवामा, पहलगाम, उरीसाठी केंद्रीय गृहमंत्री जबाबदार आहेत.
त्यांनी राजीनामा द्यायला हवा, ही राऊतांची ताजी वक्तव्य. पत्रकार नामांकित असला, अनुभवी असला तरी तो प्रगल्भ, परीपक्व असेलच याची काहीच शाश्वती नसते. तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो… हे राऊतांचे वक्तव्य ऐकल्यानंतर दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा एक किस्सा आठवला. कारगिल युद्धाच्या काळात पत्रकार प्रभू चावला अटलजींना भेटायला गेले होते. वाजपेयी शांत बसले होते. माणूस शांत बसला असला तरी त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू असते. एखादा लेखक लेखन विषयाबाबत, कवि कवितेबाबत आणि एखादा राजकीय नेता रणनीतीबाबत बसल्याबसल्या विचार करू शकतोच ना?
शांत बसलेल्या वाजपेयींना पाहून चावला म्हणाले, ‘इतना टेंशन है देश मे, और आप इतने आराम से बैठे है…’ वाजपेयी यांनी त्यांना काहीच उत्तर दिले नाही. हा प्रश्न विचारताना चावलांच्या चेहऱ्यावर कसे ओशाळवाणे हास्य असेल याचा
अंदाज ज्यांनी त्यांचे शो पाहीले आहेत, त्यांना असेलच. वाजपेयी यांनी चावलांना काहीच उत्तर दिले नाही. बेल वाजवून सेवकाला बोलावले, आणि म्हणाले, चावला साहाब के लिये चाय और मेरे लिये एके४७ ले आना. अशा किस्स्यांचे पुरावे नसतात. परंतु दिल्लीतील पत्रकारांच्या वर्तुळात गाजलेला आणि वाजलेला हा किस्सा आहे. संजय राऊतांच्या कपडे संभालोवाल्या वक्तव्यामुळे हा किस्सा पुन्हा एकदा आठवला. मोदी फिरतायत, लोकांना भेटतायत हे चांगलेच आहे ना? की कोविडच्या काळात त्यांचे मालक जसे कडी लावून घरी बसले होते, तसे मोदींनीही घरी बसावे, अशी राऊतांची इच्छा आहे?
हे ही वाचा:
डॉलरच्या तुलनेत रुपया चमकला, सात महिन्यांतली उच्चतम पातळी गाठली!
‘लव्ह जिहाद’च्या आरोपाखाली असलेल्या लोकांची नसबंदी करा!
दिल्ली उच्च न्यायालयाकडून साकेत गोखलेला धक्का
एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ शो अखेर उल्लू ॲपने घेतला मागे!
काही दे मार सिनेमे असे असतात, ज्यात काही कथा, पटकथा, दिग्दर्शन नावाचा प्रकारच मिठाएवढाही नसतो. दर दुसऱ्या मिनिटाला हाणामारी. असे सिनेमे संपवून जेव्हा प्रेक्षक जेव्हा घरी येतो, तेव्हा त्याला डोकेदुखीची गोळी हमखास घ्यावी लागते. राऊतांच्या बिनबुडाच्या डायलॉगबाजीचे सध्या तेच झालेले आहे. ना तर्क, ना सत्य, ना नजाकत, केवळ आणि केवळ दुर्गंधीचा दर्प. त्यांच्या दरबारी पत्रकांराचा नाईलाज आहे, बाकीचे लोक मात्र एक तर त्यांना हसतात किंवा शिव्या घालतात. राजकारणातील मूर्ख शिरोमणी समजले जाणारे राहुल गांधीही सध्या तोंड आवळून गप्प बसले आहेत. १० जनपथवाल्या मातोश्रींनी त्यांचे तोंड आवळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ते गप्प आहेत हे महत्वाचे.
राऊतांची मात्र तोंडाळ हगवण अखंडपणे सुरू आहे.
राज्यात मविआचे सरकार आल्यापासून हे गटार धो धो वाहते आहे. सध्या एखाद्या नदीला पूर यावा तसा या गटाराला आलेला आहे. राऊत जे बोलतात, त्याचा परिणाम काय झाला आहे, याचा अभ्यास केला की आपल्या लक्षात येते,
त्यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांना आधी उचलले, नंतर आपटलेले आहे. मुख्यमंत्री पदावरून २० आमदारांवर. तरीही त्यांचे समाधान होताना दिसत नाही. लोकांनी ठाकरे नाव आले की फक्त लाखोली वाहावी ही त्यांची इच्छा दिसते. ते ठाकरेंवर
नेमका कोणता सूड उगवातातयत, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.
देशात जेव्हा युद्धजन्य परीस्थिती निर्माण झाली, किंवा एखादे संकट आले. तेव्हा तेव्हा जनसंघ-भाजपाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या सोबत उभे राहण्याची हमी दिली. केवळ दिली नाही ती पाळली सुद्धा. ही देशभक्ती होतीच, परंतु त्यात राजकीय दूरदृष्टीचाही भाग होता. त्याचा फायदाही भाजपाला झाला. भाजपाचे समर्थक नाहीत, परंतु जे सुजाण नागरीक आहेत, अशा लोकांच्या मनात देखील भाजपाबाबत आदर निर्माण झाला. देशात आज पुन्हा युद्धमान स्थिती निर्माण झालेली आहे. लोकांची सहानुभूती, समर्थन पूर्णपणे मोदींच्या बाजूने आहे. तरीही राऊत रोज सकाळ संध्या काळ त्यांच्या
आरत्या ओवाळताना दिसतात. तेव्हा प्रश्न निर्माण होतो, की जे एखाद्या रेम्या डोक्याच्या माणसाला कळते ते यांना कळत नसेल? ते रोज उठून अशी वक्तव्य करतात की उबाठा शिवसेनेबाबत लोकांच्या मनात असलेला संताप वाढतच जाईल.
ठाकरेंना शिव्या घातल्याशिवाय लोकांचा एकही दिवस जाणार नाही, याची काळजी ते नियमितपणे घेत असतात. कधी काळी हेच राऊत राजकारणाला गटार म्हणायचे, सामनाचे कार्यकारी म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्याच गटारात ते अलिकडे मजेमजेत लोळताना दिसतात. पहेलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सर्वच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला समर्थन दिलेले आहे. शरद पवारांचाही त्यात समावेश आहे. म्हणून राऊत सध्या त्यांनाही बडवताना दिसतायत. शरद पवार समजायला शंभर जन्म घ्यावे लागतील, हे त्यांचे वक्तव्य फार जुने नाही. राऊतांचा हा कितवा जन्म आहे, हे कळायला मार्ग नाही.
राऊत नावाचा सुतळी बॉम्ब एकदा वापरला, त्याचा दुसऱ्यांदा काही उपयोग नाही. हे पवारांनाही ठाऊक होते. त्यांनी राऊतांना फोडून आधी ठाकरेंना जोडले. आणि नंतर व्यवस्थित संपवले. जोपर्यंत ठाकरेंची ताकत दोती, होती तोपर्यंत राऊतांची उपयुक्तता होती. आता ती संपलेली आहे. हे राऊतांच्याही लक्षात आल्यामुळे ते वारंवार पवारांवर करताना आणि राहुल गांधी यांच्या आरत्या ओवाळताना दिसतात. राऊत ज्यांचे कपडे सांभाळतायत, ते अलिकडे युरोपात होते. तुर्तास ते
कुठे आहेत, यावर राऊतांनी तोंड उघडावे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)