पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारताच्या या ऑपरेशनला एक वर्ष पूर्ण होत असतानाच एका पाकिस्तानी नेत्याने उघडपणे कबूल केले आहे की, पाकिस्तानी लष्कराने हाफिज सईद आणि मसूद अझरसारख्या दहशतवाद्यांसाठी लढा दिला. दहशतवाद्यांच्या एका सभेत केलेल्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानची खरी धोरणे पुन्हा एकदा उघड झाली आहेत.
पाकिस्तानी नेते शाहीर सियालवी यांनी यासंबंधी वक्तव्य केले आहे. ‘आज तक’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. पहिल्यांदाच पाकिस्तानी सैन्याने हाफिज सईद आणि मसूद अझर यांच्यासाठी लढा दिला. त्यांनी हेही मान्य केले की, भारताने १० मे रोजी मुरीदके (लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय) आणि बहावलपूर (जैश-ए-मोहम्मदचे केंद्र) येथील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवादी ठार झाले.
सियालवी यांच्या मते, हल्ल्यांनंतर पाकिस्तानने जगाची दिशाभूल करण्यासाठी आपली रणनीती बदलली. दहशतवाद्यांच्या अंत्यविधीची प्रार्थना एखाद्या धर्मगुरू किंवा मुफ्तीने नव्हे, तर पाकिस्तानी लष्कराच्या एका धार्मिक अधिकाऱ्याने केली. गणवेश घातलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी या दहशतवाद्यांचे मृतदेह उचलले. मारले गेलेले दहशतवादी नसून स्वातंत्र्य सैनिक होते, हे जगाला दाखवणे हा यामागील उद्देश होता. हे विधान लश्कर-ए-तोयबाच्या एका कार्यक्रमात करण्यात आले, ज्याला अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केलेला मुजम्मिल इक्बाल हाश्मी उपस्थित होता. या बैठकीतून पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांमधील घनिष्ठ संबंध स्पष्टपणे दिसून आले.
हे ही वाचा:
इराणच्या यूएईवरील हल्ल्यांमध्ये तीन भारतीय जखमी
टागोर यांच्या जयंतीदिनी, पश्चिम बंगालमध्ये नवे सरकार घेणार शपथ
आरजी कर प्रकरणाचा तृणमूलला दणका; पानीहाटीमध्ये भाजपच्या रत्ना देबनाथ यांचा विजय
युक्रेनला कठोर इशारा देत रशियाकडून एकतर्फी युद्धविराम
या विधानावरून हे सिद्ध होते की पाकिस्तान केवळ दहशतवादाविरोधात असण्याचे नाटक करतो. प्रत्यक्षात, त्याचे सैन्य काही दहशतवादी संघटना आणि त्यांच्या नेत्यांना उघडपणे पाठिंबा देत आहे. पाकिस्तान हाफिज सईद आणि मसूद अझरसारख्या दहशतवाद्यांना आपले सुरक्षा दल मानतो . पाकिस्तानचे हे धोरण त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नामुष्कीचे आहे. यामुळे जगासमोर त्यांचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षभरानंतर एका पाकिस्तानी नेत्याने केलेले हे वक्तव्य भारतासाठी नवीन नाही, परंतु पाकिस्तान दहशतवादाचा वापर राजधोरण म्हणून करत असल्याचा हा जगासाठी पुरावा आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देतो, असे भारताने सातत्याने म्हटले आहे. आता तर पाकिस्तानचे लोक स्वतःच हे मान्य करत आहेत. पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात, दहशतवाद्यांना धडा शिकवणे आवश्यक असल्याचा दावा करत भारताने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि जैशच्या प्रमुख तळांवर अचूक हल्ले केले.







