30 C
Mumbai
Monday, May 11, 2026
घरदेश दुनियानागरिक आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे अस्वीकार्य!

नागरिक आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे अस्वीकार्य!

फुजैरा हल्ल्यावर भारताने व्यक्त केला निषेध

Google News Follow

Related

भारताने संयुक्त अरब अमिराती (UAE)मधील फुजैरा पेट्रोलियम इंडस्ट्री झोनवरील इराणी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. भारत सरकारने हा हल्ला “अस्वीकार्य” असल्याचे म्हणत तात्काळ शत्रुत्व थांबवण्याची आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबवण्याची मागणी केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर म्हटले, “फुजैरामधील हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी होणे अस्वीकार्य आहे. आम्ही तात्काळ हे हल्ले थांबवण्याचे आणि नागरिक तसेच नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले होऊ नयेत यासाठी आवाहन करतो. पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी भारत संवाद आणि कूटनीतीचा मार्ग समर्थित करतो.” ते पुढे म्हणाले की, भारत आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत होर्मुज सामुद्रधुनीत मुक्त आणि अखंडित नौवहन व व्यापाराला पाठिंबा देतो आणि शांततापूर्ण तोडग्यासाठी सर्व प्रयत्नांत सहकार्य करण्यास तयार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला. ते म्हणाले, “UAEवर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो, ज्यात तीन भारतीय जखमी झाले आहेत. नागरिक आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे अस्वीकार्य आहे. भारत UAEच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि सर्व प्रश्नांचे शांततापूर्ण समाधान संवाद आणि कूटनीतीतूनच व्हावे, यासाठी आम्ही समर्थन करतो.”

सोमवार (४ मे) रोजी इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांदरम्यान फुजैरा ऑइल इंडस्ट्री झोनमध्ये आग लागली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्या. UAEच्या संरक्षण मंत्रालयानुसार, या हल्ल्यात चार क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यापैकी तीन हवाई संरक्षण यंत्रणेने पाडली, तर एक समुद्रात कोसळले.

हा परिसर UAEसाठी अत्यंत धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, कारण येथेून देश होर्मुज सामुद्रधुनीला वळसा घालत ओमानच्या आखातातून तेल निर्यात करतो. हल्ल्यादरम्यान दुबई आणि अबू धाबी यांसह अनेक शहरांमध्ये संभाव्य क्षेपणास्त्र धोक्याबाबत नागरिकांना सतर्कतेचे इशारे देण्यात आले. अबू धाबीतील भारतीय दूतावासाने सांगितले की, ते स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत असून जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत दिली जात आहे. प्रभावित भारतीयांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे दूतावासाने आश्वासन दिले आहे.

हे ही वाचा:

इराणच्या यूएईवरील हल्ल्यांमध्ये तीन भारतीय जखमी

टागोर यांच्या जयंतीदिनी, पश्चिम बंगालमध्ये नवे सरकार घेणार शपथ

आरजी कर प्रकरणाचा तृणमूलला दणका; पानीहाटीमध्ये भाजपच्या रत्ना देबनाथ यांचा विजय

युक्रेनला कठोर इशारा देत रशियाकडून एकतर्फी युद्धविराम

UAEच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याला “विश्वासघातकी” ठरवत तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे आणि आवश्यक ते प्रत्युत्तर देण्याचा देशाला पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात झालेल्या युद्धविरामानंतर प्रदेशात काही प्रमाणात शांतता निर्माण झाली होती. मात्र, ताज्या हल्ल्यांमुळे तो विराम भंग झाला असून पुन्हा एकदा खाडी प्रदेशात तणाव वाढला आहे. त्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा