32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरक्राईमनामानीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

ब्रिटनने याचिका फेटाळली

Google News Follow

Related

फरारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी हजारो कोटींचे कर्ज घेऊन भारतातून फरार झाला होता आणि तो ब्रिटनमध्ये आहे. आता युनायटेड किंग्डम न्यायालयाने नीरव मोदीची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली आहे. नीरव मोदीकडे प्रत्यार्पण टाळण्याची शेवटची संधी होती. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे.

गेल्या महिन्यात ९ नोव्हेंबर रोजी लंडनमधील उच्च न्यायालयाने नीरव मोदीला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा निर्णय दिला होता. मात्र, उच्च न्यायालयात दुसरी याचिका दाखल करून त्यांनी ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात आपल्या प्रत्यार्पणाविरोधात याचिका दाखल करण्याची मागणी केली. याच याचिकेवर आज लंडनच्या उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्याआधी, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये वेस्टमिन्स्टरच्या न्यायाधीशांनी त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, नंतर त्यांना या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची परवानगी देण्यात आली. नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी भारत अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. पण ब्रिटनच्या तुरुंगात बंद असलेला नीरव मोदी आपले प्रत्यार्पण थांबवण्यासाठी वेगवेगळे तर्क देत आहे.

त्याच्याकडे आता कोणताही पर्याय उरला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याला आता भारतात यावे लागणार आहे. यापूर्वी नीरव मोदीने ब्रिटनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रत्यार्पणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्याची मागणी केली होती. यामुळे उच्च न्यायालयाने नीरवची ती याचिका फेटाळली होती ज्यात त्याच्या प्रत्यार्पणाची चिंता करत त्याला दिलासा देण्याची मागणी केली होती. या याचिकेत नीरवने म्हटले होते की, जर त्याला भारतात प्रत्यार्पण केले गेले तर तो आत्महत्या करू शकतो. त्यावर न्यायालयाने त्यांना फटकारले आणि सांगितले की त्यांची प्रकृती ठीक आहे आणि त्यांना कोणताही आजार नाही.

हे ही वाचा:

अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’

धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन

श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती

१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!

त्याचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते. तथापि, असे असूनही नीरवने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती जिथे त्याला पराभवाचा सामना करावा लागला आणि आता त्याला भारतात आणले जाऊ शकते. विशेष म्हणजे नीरव मोदी २०१८ मध्ये पंजाब नॅशनल बँकेकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकार नीरवला भारतात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा