पाकिस्तानच्या सततच्या कुरघोड्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच दोन्ही देशांमधील तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानने नॅशनल कमांड ऑथॉरिटीची बैठक बोलावल्याचे वृत्त समोर आले होते. नॅशनल कमांड ऑथॉरिटी ही पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवरील ऑपरेशनल निर्णय घेण्यासाठी जबाबदार आहे. हे वृत्त समोर येताच या बैठकीची नोंद जगभरातून घेण्यात आली. मात्र, पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे आता त्यांच्याचं मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नॅशनल कमांड ऑथॉरिटीच्या बैठकीचे वृत्त खोटे असल्याचे समोर आले असून पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड पडला आहे.
पाकिस्तानच्या कुरापती आणि भारताकडून केले जाणारे प्रत्युत्तर म्हणून केलेले हल्ले यामुळे अमेरिकेने दोन्ही अण्वस्त्रधारी शेजारी देशांना आपापसात चर्चा सुरू करण्याचे आणि संघर्ष कमी करण्याचे आवाहन केले. नॅशनल कमांड ऑथॉरिटीची बैठक होत असल्याचे वृत्त समोर आल्याने देशांच्या अण्वस्त्रसाठ्यांचा वापर होऊ शकतो अशी भीती निर्माण झाली होती, परंतु पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी नंतर सांगितले की अशी कोणतीही बैठक नियोजित नाही.
हे ही वाचा..
मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची घेतली माहिती
ऑपरेशन सिंदूर : पाकिस्तानमधील टॉप-५ दहशतवाद्यांचा खात्मा
भारताच्या प्रत्युत्तर हल्ल्यांनी पाक बिथरला! परराष्ट्र मंत्री म्हणतात, तणाव कमी व्हावा
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तात्काळ आण्विक धोक्याला दुर्लक्षित केले आणि हा खूप दूरचा पर्याय असल्याचे म्हटले. त्यावर तात्काळ चर्चा करू नये, असे त्यांनी सांगितले. त्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वी संघर्ष कमी होईल, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय कमांड प्राधिकरणाची कोणतीही बैठक झालेली नाही आणि अशी कोणतीही बैठकही नियोजित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी सांगितले की, जर भारत थांबला तर आम्हीही संघर्ष थांबवू.