27.7 C
Mumbai
Sunday, August 16, 2026
घरराजकारणआपण भ्रष्टाचार केला नाही म्हणत तृणमूल नेत्याची आत्महत्या

आपण भ्रष्टाचार केला नाही म्हणत तृणमूल नेत्याची आत्महत्या

आदल्या दिवशी ध्वजवंदन कार्यक्रमात घेतला होता सहभाग

Google News Follow

Related

तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आशीष बॅनर्जी यांचा मृतदेह रविवारी सकाळी राज्यातील बीरभूम जिल्ह्यातील एका पक्ष कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

ते माजी मंत्री तसेच रामपूरहाट मतदारसंघाचे पाच वेळा आमदार होते. २००१ ते २०२६ या कालावधीत सलग २५ वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांचा भारतीय जनता पक्षाचे ध्रुव साहा यांच्याकडून पराभव झाला.

त्यांचा मृतदेह त्यांच्या रामपूरहाट येथील निवासस्थानाला लागून असलेल्या तृणमूल कार्यालयातून सापडला. याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या स्थानिक कार्यक्रमात, बॅनर्जी सहभागी झाले होते आणि तेथे त्यांनी तिरंगा फडकावला होता.

हे ही वाचा:

विरोधी पक्षांची कामं करतायत पोरं टोरं !

जलाशयांवर अवतरणार ‘सूर्य’

उत्तर प्रदेशात ‘एनालॉग’ पनीर-घीवर बंदी

क्रिकेटविश्वाचा देशाला सलाम!

एक कथित सुसाइड नोट देखील सापडली आहे. त्या कथित पत्रात बॅनर्जी यांनी कोणतेही गैरकृत्य केल्याचे ठामपणे नाकारले आणि आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत आपण कधीही भ्रष्टाचारात सहभागी झालो नाही, असे सांगितले.

त्यांनी तारापीठ रामपूरहाट विकास प्राधिकरण संबंधित कथित गैरप्रकारांच्या आरोपांचा उल्लेख केला असल्याचे दिसते. ते या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

बॅनर्जी यांनी दावा केला की, निविदांशी संबंधित निर्णय, धनादेश जारी करणे, आराखड्यांना मंजुरी देणे किंवा ना-हरकत प्रमाणपत्रे  देणे यामध्ये त्यांची कोणतीही भूमिका नव्हती. त्यांनी असा आरोप केला की, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे आणि त्यांचा अपमान करण्याचे प्रयत्न केले गेले. तसेच, राजकारणात प्रवेश करणे ही आपली चूक होती, असेही त्यांनी म्हटले.

या ज्येष्ठ तृणमूल नेत्याने पुढे असेही लिहिले की, पक्षातील “चुकीच्या गोष्टींविरोधात” ते नेहमीच निषेध नोंदवू शकत नव्हते. निवडणुकीतील पराभवानंतर बॅनर्जी राजकारणात फारसे सक्रिय दिसून आले नाहीत.

त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची सत्ता गेली होती. १५ वर्षांच्या राजवटीनंतर २०२६ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने सरकार स्थापन केले.

राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर अनेक माजी तृणमूल नेते आणि आमदारांना भ्रष्टाचाराशी संबंधित तपास आणि अटकांना सामोरे जावे लागले आहे.

बॅनर्जी यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती तात्काळ स्पष्ट झाली नव्हती. पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा