31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरराजकारणशशी थरूर यांचे भाकीत... ‘भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल’

शशी थरूर यांचे भाकीत… ‘भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल’

केरळ लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये शशी थरूर यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, असे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी वर्तवले आहे. मात्र पुढील निवडणुकीत भाजपच्या जागांची संख्या अशा पातळीवर आणली जाऊ शकते, जिथे त्यांचे सहयोगी यापुढे त्यांना पाठिंबा देण्यास तयार नसतील, असेही ते म्हणाले.

‘मला अजूनही अपेक्षा आहे की भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. परंतु मला विश्वास आहे की त्यांची संख्या अशा पातळीवर आणली जाऊ शकते जिथे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले त्यांचे संभाव्य सहकारी घटक पक्ष यापुढे त्यांच्याशी युती करण्यास तयार नसतील आणि कदाचित आमच्यासोबत युती करण्यास इच्छुक असतील. त्यामुळे आम्हाला प्रयत्न करावे लागतील,’ असे थरूर यांनी शनिवारी कोझिकोड येथील केरळ लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना स्पष्ट केले.

हे ही वाचा..

मुंबई- काळाचौकी परिसरातील पालिकेच्या शाळेत सिलेंडर्सचा स्फोट!

शरद मोहोळ हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक!

अखिलेश यादव म्हणतात अयोध्येला नंतर जाणार

‘आम्हाला गाझामध्ये कोणीही रोखू शकत नाही’

‘इंडिया’ आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेवर, थरूर म्हणाले की त्यांना शक्य तितक्या राज्यांमध्ये ‘पुरेसे करार’ होण्याची आशा आहे, जेणेकरून पराभव टाळता येतील. विविध राज्यांच्या राजकीय स्वरूपाच्या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘काही राज्यांमध्ये सर्व विरोधी पक्षांमध्ये एकमत होऊन भाजपविरोधात एकच उमेदवार दिला जाईल. काही राज्यांत मात्र दोन ते तीन उमेदवार उभे राहू शकतात. अशा परिस्थितीत त्यांचे योग्य प्रकारे प्रतिनिधीत्व करणाऱ्या उमेदवारांना त्यांना निवडून द्यावे लागेल,’ असे ते म्हणाले.

थरूर यांनी निदर्शनास आणून दिले की केरळमध्ये, इंडिया आघाडीचे दोन प्रमुख विरोधक, माकप आणि काँग्रेस, कधीही जागावाटपावर सहमत असतील याची कल्पना करणे जवळजवळ अशक्य आहे. त्याच वेळी, शेजारच्या तामिळनाडूमध्ये, सीपीआय, सीपीआय(एम), काँग्रेस आणि डीएमके सर्व एकत्र आहेत आणि त्याच्यात कोणताही वाद नाही. या देशातील जनतेला लक्षात आणून देण्याची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील सर्वोत्तम व्यक्तीला मतदान करणे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि त्यामुळे १०० टक्के राज्यांमध्ये १०० टक्के करार होऊ शकत नाहीत, या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते पूर्णपणे तयार असल्याचेही ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा