28 C
Mumbai
Sunday, June 15, 2025
घरराजकारण“राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावर कुठेही कमी पडणार नाही”

“राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावर कुठेही कमी पडणार नाही”

सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर शशी थरूर यांनी स्पष्ट केली भूमिका

Google News Follow

Related

भारत- पाकिस्तान संघर्ष आणि या मुद्द्यावर भारताची भूमिका याबद्दल प्रमुख विदेशी सरकारांना माहिती सरकार परदेशात पाठवण्याची योजना आखत असलेल्या सात सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांपैकी एकाचे नेतृत्व करण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर शशी थरूर यांनी यावर प्रतिक्रिया देताना शनिवारी म्हटले की, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी सरकारकडून मिळालेल्या आमंत्रणामुळे ते सन्मानित झाले आहेत. तसेच जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो तेव्हा ते कुठेही कमी पडणार नाहीत, असा विश्वास शशी थरूर यांनी व्यक्त केला आहे.

“अलीकडील घटनांबद्दल आपल्या देशाचा दृष्टिकोन मांडण्यासाठी पाच प्रमुख राजधान्यांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सरकारकडून आमंत्रित केल्याबद्दल मला सन्मान वाटतो. जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो आणि माझी आवश्यकता असेल तेव्हा मी कमी पडणार नाही. जय हिंद!” अशी पोस्ट शशी थरूर केली आहे. ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या सततच्या लढाईच्या संदर्भात, या महिन्याच्या अखेरीस सात सदस्यांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देणार आहेत.

सात शिष्टमंडळांचे नेतृत्व काँग्रेस नेते शशी थरूर, भाजप नेते रविशंकर प्रसाद, जेडीयू नेते संजय कुमार झा, भाजप नेते बैजयंत पांडा, द्रमुक नेत्या कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे आणि शिवसेना नेते श्रीकांत एकनाथ शिंदे हे करणार आहेत.

एक्स वरील एका पोस्टमध्ये, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की भारत एकजूट आहे आणि सात सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख भागीदार राष्ट्रांना भेट देतील. “सर्वात महत्त्वाच्या क्षणी, भारत एकजूट आहे. सात सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख भागीदार राष्ट्रांना भेट देतील, दहशतवादाला शून्य सहनशीलतेचा आमचा सामायिक संदेश घेऊन जातील. राजकारणाच्या पलीकडे, मतभेदांच्या पलीकडे राष्ट्रीय एकतेचे एक शक्तिशाली प्रतिबिंब,” असे रिजिजू यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणातील दोघांना मुंबईतून अटक

भारत पाक संघर्षात इस्रोच्या उपग्रहांनी काय काय टिपले?

कबूल..कबूल…कबूल…शरीफ म्हणतात, भारताने नूर खान एअरबेस उद्ध्वस्त केला!

परवाना रद्द केल्यानंतर तुर्कीयेच्या सेलेबी कंपनीची उच्च न्यायालयात धाव

प्रत्येक शिष्टमंडळात विविध पक्षांचे संसद सदस्य, प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वे आणि प्रतिष्ठित राजनयिक सहभागी असतील. हा दौरा २३ मे पासून सुरू होईल आणि १० दिवसांचा असेल अशी शक्यता आहे. संसद सदस्यांचे गट अमेरिका, युनायटेड किंग्डम, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण आफ्रिका आणि जपानसह अनेक प्रमुख जागतिक राजधान्यांना भेट देण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा