ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने आयपीएल २०२५ मधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी थांबवल्या गेल्यानंतर हा निर्णय घेतला गेला.
स्टार्कने आपयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी ११ सामन्यांत १४ बळी घेतले होते. त्यानंतर स्पर्धा थांबवण्यात आली. त्यानंतर स्टार्क आणि ऑस्ट्रेलियन टीममधील सहकारी जेक फ्रेजर-मॅकगर्क धर्मशाळेतून बस आणि ट्रेनने दिल्लीला आले. मात्र, त्यानंतर स्टार्क आयपीएलच्या उर्वरित भागासाठी परत आला नाही आणि दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही.
स्टार्कने सांगितले, “माझ्या निर्णयाबाबत मला समाधान आहे आणि जी परिस्थिती होती, ती कशी हाताळली गेली, याबाबतही मला समाधान आहे. म्हणूनच मी पुढील निर्णय घेतला. या निर्णयाचे परिणाम काय होतील ते वेळच सांगेल.”
त्यांनी पुढे म्हटले, “माझ्या मनात काही प्रश्न आणि चिंता होत्या. त्या परिस्थितीने माझ्या निर्णयावर परिणाम केला. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान (पाकिस्तानमध्ये) देखील याचा काहीसा प्रभाव होता. नंतर जेव्हा टूर्नामेंट उशीर झाला, तेव्हा मी कसोटी क्रिकेटसाठी तयारीवर विचार केला.”
स्टार्कने ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’शी बोलताना सांगितले, “हा निर्णय प्रत्येक खेळाडूसाठी वेगळा होता. धर्मशाळेत असलेल्या खेळाडू आणि पंजाबच्या खेळाडूंनी भिन्न निर्णय घेतले. जेक आणि मी परत न येण्याचा निर्णय घेतला. हा माझा वैयक्तिक निर्णय होता, आणि जो काही परिणाम होईल तो स्वीकारण्यासाठी मी तयार आहे.”
तो पुढे म्हणाला, “मी अजूनही दिल्ली कॅपिटल्ससाठी खूप कटिबद्ध आहे. मी आयपीएलमध्ये निलामीत निवडला गेला आणि नंतर बाहेर पडणारा खेळाडू नाही. ही परिस्थिती वेगळी होती. मला पुरेशी माहिती नव्हती आणि मी निर्णय घेतला.”
