अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गासाठी काही तरी भरीव असेल अशी अपेक्षा होती. अर्थमंत्र्यांनी मध्यमवर्गीयांना सुखद धक्का देत १२ लाख उत्पन्नापर्यंत कोणताही कर द्यावा लागणार नसल्याची घोषणा केली. मध्यमवर्गीयांसाठी करण्यात आलेलीही सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी आहेच, शिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देणारी आहे. केंद्र सरकारने एका दगडात तीन पक्षी मारलेले आहेत.