जालन्यात उपोषण करणाऱे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची अखेर महायुती सरकारला आठवण झाली. त्यांना भेटायला गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे शिष्टमंडळ गेले होते. ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देणार नाही, असे लेखी लिहून देईपर्यंत उपोषण सोडणार नाही, असे हाकेंनी या शिष्टमंडळाला सांगितले. याच दरम्यान अंतरावली येथून हाके यांच्या भेटीसाठी आज मोठ्या संख्येने दलित आणि ओबीसी समाजातील लोक आले होते. या सगळ्या घडामोडींमुळे मनोज जरांगे प्रचंड अस्वस्थ आहेत.