आज १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातली पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे धावली. तीन वाफेच्या इंजिनांसह सुरू झालेला रेल्वेचा प्रवास आज वंदे भारत सारख्या अत्याधुनिक रेल्वे, मालवाहतूकीसाठी स्वतंत्र मार्गिका, मालवाहतूकीची पायथन ट्रेन अशा मुक्कामांपर्यंत १६८ वर्षांनंतर पोहोचला आहे. आसेतुहिमाचल पसरलेल्या भारतीय रेल्वेची सुरूवात इंग्रजांनी केली खरी, परंतु या रेल्वेने भारतीयांच्या भारतीयत्वाला घट्ट करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. जाणून घेऊया रेल्वेच्या १६८ वर्षांच्या प्रवासाबद्दल.