29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणकसा झाला अपात्रतेच्या कारवाईचा गेम ???

कसा झाला अपात्रतेच्या कारवाईचा गेम ???

Related

संख्याबळ गमावलेल्या महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर पेच काढून सरकार टीकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विधानसभेत तिन्ही पक्ष आणि अपक्ष मिळून १७० आमदारांचा सरकारला पाठींबा होता. परंतु त्यापैकी सुमारे ५० आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला रवाना झाल्यापासून सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे १६ आमदारांना अपात्र करायचे, जेणे करून उर्वरीत आमदार नाक मुठीत घेऊन शरण येतील आणि सरकार वाचेल असा हिशोब करून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी १६ आमदारांना नोटीस बजावली आणि ४८ तासांत नोटीशीचे उत्तर द्यायला सांगितले. या आमदारांना अपात्र केल्यावर सरकार वाचेल असा ठाकरे सरकारचा हिशोब होता. परंतु शिंदे गटाच्या आमदारांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज त्यांच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत महाविकास आघाडीचे सर्व डावपेच उधळले गेले. न्यायमूर्ती सुर्यकांत आणि जे.बी.पारडीवाला यांच्या खंडपीठाने उपाध्यक्षांच्या पत्राला उत्तर देण्याची मुदत १२ जुलैपर्यंत वाढवली. याप्रकरणी उपाध्यक्ष झिरवळ यांनाही सविस्तर प्रतिज्ञापज्ञ दाखल करायला सांगितले आहे. #Eknath Shinde #Sanjay Raut #Dinesh Kanji

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा