मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध चालू असल्याची चर्चा जोरात आहे. मुळात हे शीतयुद्ध नसून मंत्रालय आणि प्रशासनाच्या संस्कृतीत होत असलेला बदल आहे. भाजपाला २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश हवे असेल ही संस्कृती बदलणे गरजेचे होते. ती बदलली जाते आहे, त्याचे थोडेफार झटके, अनेकांना बसताना दिसतायत.