34 C
Mumbai
Monday, June 1, 2026
घरविशेष४० लाख घरे रूफटॉप सोलरशी जोडली; सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी ‘या’ राज्यांमध्ये

४० लाख घरे रूफटॉप सोलरशी जोडली; सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी ‘या’ राज्यांमध्ये

पीएम सूर्य घर योजनेअंतर्गतची आकडेवारी समोर

Google News Follow

Related

भारतात ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ अंतर्गत रूफटॉप सोलरशी जोडल्या गेलेल्या घरांची संख्या ४० लाखांवर पोहोचली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली ही योजना केवळ नागरिकांना वीजबिलांपासून दिलासा देत आत्मनिर्भर बनवत नाही, तर पर्यावरण संरक्षणालाही मोठी मदत करत आहे. ते पुढे म्हणाले की, भारत आता सौरऊर्जेच्या क्षेत्रात महासत्ता बनला असून स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने ही देशाची मोठी उपलब्धी आहे.

या यशाबद्दल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, “आता तुमच्या घराचे छतच ऊर्जा निर्माण करत आहे. कुटुंब अधिक सक्षम होत असून जीवन आत्मनिर्भर बनत आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत ४० लाखांहून अधिक कुटुंबे सौरऊर्जेशी जोडली गेली आहेत.” ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत केवळ वीज बचत करत नाही, तर ऊर्जा क्षेत्रात नव्या परिवर्तनाची क्रांतीही घडवत आहे.”

या योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२६ मध्ये (५ मार्चपर्यंत) १४,५८५.२९ कोटी रुपयांचा निधी वापरण्यात आला असून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ही रक्कम ७,८२२.९२ कोटी रुपये होती. २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेली ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ ही मागणी-आधारित योजना आहे. स्थानिक वीज वितरण कंपनीच्या ग्रीडशी जोडलेले वीज कनेक्शन असलेले सर्व निवासी ग्राहक राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करून रूफटॉप सोलर सिस्टीम बसवण्याचा लाभ घेऊ शकतात.

हे ही वाचा:

भारतीय इस्रायलवर वेड्यासारखं प्रेम करतात…

विनेश फोगाटला आशियाई खेळांच्या निवड चाचण्यांत उतरण्याची परवानगी

वाइस ऍडमिरल अजय कोचर भारतीय नौदलाचे नवे उपप्रमुख

कॉकरोच जनता पार्टीच्या एक्स खात्यावरील बंदी कायम!

सरकारच्या अंदाजानुसार, एक कोटी घरांमध्ये रूफटॉप सोलर सिस्टीम बसवल्यास १,००० अब्ज युनिट नवीकरणीय वीज निर्मिती होऊ शकते. यामुळे सिस्टीमच्या २५ वर्षांच्या कालावधीत सुमारे ७२० दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होण्याची शक्यता आहे. २०२५ अखेरपर्यंत या योजनेची सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
310,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा